AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार एनडीए सरकार झालं, उद्धव ठाकरे यांचा चिमटा; मोदी सरकारच्या भवितव्यावर मोठी भविष्यवाणी काय ?

या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय.

मोदी सरकार एनडीए सरकार झालं, उद्धव ठाकरे यांचा चिमटा; मोदी सरकारच्या भवितव्यावर मोठी भविष्यवाणी काय ?
| Updated on: Jun 15, 2024 | 3:46 PM
Share

या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय. ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक हा संभ्रम आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर निशाण साधला. किती दिवस सरकार राहील हे सांगता येत नाही असे नमूद करत या सरकारचं भवितव्य कठीण असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुनावलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

विधानसभेत सर्वांना सोबत घेणार

लोकसभा निवडणुकीत मोठी कामगिरी फत्ते केल्याने महाविकास आघाडीकडे मोठे बळ आले आहे. आता विधानसभेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. हेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

चालुगिरी करायला लागले, तर…

आमचा गुजरातबद्दल राग नाही. उद्या आमचं सरकार आल्यावर आम्ही गुजरातच्या हक्काचं देऊ. पण मोदी आणि शहा गुजरात आणि देशात फळी निर्माण करत आहे. त्यांनी प्रत्येकाला त्याच्या हक्काचं दिलं पाहिजे. त्यालाच केंद्र सरकार म्हटलं जातं. केंद्र सरकार म्हणणं चुकीचं आहे. कारण आपली संघराज्य पद्धत आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता, आता तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली