AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार एनडीए सरकार झालं, उद्धव ठाकरे यांचा चिमटा; मोदी सरकारच्या भवितव्यावर मोठी भविष्यवाणी काय ?

या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय.

मोदी सरकार एनडीए सरकार झालं, उद्धव ठाकरे यांचा चिमटा; मोदी सरकारच्या भवितव्यावर मोठी भविष्यवाणी काय ?
| Updated on: Jun 15, 2024 | 3:46 PM
Share

या निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे. आता मोदी सरकार नाही, तर हे एनडीए सरकार आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. ते आम्हाला अनैसर्गिक युती म्हणत होते. पण आता त्यांचंच कडबोळं झालंय. ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक हा संभ्रम आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर निशाण साधला. किती दिवस सरकार राहील हे सांगता येत नाही असे नमूद करत या सरकारचं भवितव्य कठीण असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुनावलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

विधानसभेत सर्वांना सोबत घेणार

लोकसभा निवडणुकीत मोठी कामगिरी फत्ते केल्याने महाविकास आघाडीकडे मोठे बळ आले आहे. आता विधानसभेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. हेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे. त्यासाठी सर्वांचीच मदत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

चालुगिरी करायला लागले, तर…

आमचा गुजरातबद्दल राग नाही. उद्या आमचं सरकार आल्यावर आम्ही गुजरातच्या हक्काचं देऊ. पण मोदी आणि शहा गुजरात आणि देशात फळी निर्माण करत आहे. त्यांनी प्रत्येकाला त्याच्या हक्काचं दिलं पाहिजे. त्यालाच केंद्र सरकार म्हटलं जातं. केंद्र सरकार म्हणणं चुकीचं आहे. कारण आपली संघराज्य पद्धत आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता, आता तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत