AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस…

Monsoon Rain Update : राज्यात मॉन्सूनचा पाऊस अध्याप दाखल झाला नाही. त्यामध्येच अत्यंत वाईट बातमी मॉन्सूनबाबत पुढे येत आहे. अजून काही दिवस मॉन्सूनच्या पावसाकरिता वाट पाहावी लागणार आहे. 20 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणार नाही.

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, अजून 8 दिवस...
Monsoon Rain
| Updated on: Jun 17, 2026 | 7:12 AM
Share

जूनची 17 तारीख आली. मात्र, मॉन्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येत आहे. ओडिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मॉन्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मॉन्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत आहे. 20 जून 2026 रोजी मॉन्सून मुंबईसह राज्यात दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र, सध्याची मॉन्सूनची स्थिती बघता राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मॉन्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला देखील मॉन्सूनचा पाऊस नसेल. पुढील आठ दिवस म्हणजे जून महिनाही मॉन्सूनशिवाय कोरडा जाण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मॉन्सूनला आग्रेय दिशेने वारा अडथळा निर्माण करत आहे. तरीही मॉन्सून हळूहळू करून पुढे सरकत आहे. मात्र, अरबी समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येतंय. राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनही अजिबातच प्रगती नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्याकरिता अजून वाट पाहवी लागणार आहे. हर्णे, सोलापूर, हैद्राबाद, कोरापूट, फलबाणी, रांची, जमुईपर्यंत पुढे मॉन्सून पुढे सरकत आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पहिल्यांदा सांगण्यात आले की, 15 जून 2026 पर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होईल. त्यानंतर 20 जूनला मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज होता. मात्र, आता थेट 8 दिवस महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचा वेळ लागू शकतो, असा अंदाज आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. शिवाय राज्यातील जवळपास धरणातील पाणीसाठा तळाला गेला. ज्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे आहे.

मॉन्सून रखडलेला आहे. त्यामध्येच राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. पुढील दोन ते तीन दिवसात तापमानात अधिक वाढ होण्याचे संकेत आहेत. पाणीटंचाई आणि वाढती उष्णता ही मोठी समस्या निर्माण झाली. यासोबतच धरणातील पाणीसाठा वाचवण्याकरिता पाणीकपात करण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!