AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल

महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला.

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही? मराठा क्रांती मोर्चाचा सवाल
| Edited By: | Updated on: Sep 14, 2020 | 5:47 PM
Share

पुणे : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला. (Maratha Kranti Morcha Press Conference on Maratha Reservation)

“मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश उठवण्यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकारनं हे करावं. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे. मुंबईत डान्सबारच्या बाबतीत चार वेळा अध्यादेश काढले, तर मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही,” असा सवालही राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थितीत केला.

“मराठा समाजाच्या आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी मुख्य न्यायाधिशांना राज्य सरकारनं विनंती करावी. ही स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. ही स्थगिती मिळताच राज्य सरकारनं त्वरीत नवीन आदेश काढत आरक्षणात मिळालेल्या गोष्टी थांबवण्यात आल्याच कळतं आहे,” असेही राजेंद्र कोंढरे म्हणाले.

“अनेक मंत्री हे मराठा समाजासोबत दुजाभाव ठेवतात. लोकांना आता हे लक्षात आलंय की मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीत अडथळा आणायच काम होतं आहे. मग आता निदर्शन कशी थांबवायची? ॲडमिशनच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार की नाही?” असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केले.

“आम्हाला अतिरिक्त फायदा देऊ नका. पण आमच्यावर अन्याय होता कामा नये. विद्यार्थ्यांना दिलासा मिळणं हे खूप महत्वाचं आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.

“येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.” (Maratha Kranti Morcha Press Conference on Maratha Reservation)

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.