AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

Maratha Reservation : समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना विरोध संपला - मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jan 27, 2024 | 11:53 AM
Share

नवी मुंबई | 27 जानेवारी 2024 : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज पहाटेच त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यामुळे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं , उत्साहाचं वातावरण आहे.

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेत सर्वांना संबोधित केलं.  सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे त्यांनू नमूद केले.  ‘ एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दलही ते बोलले. ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही द्यावं ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

सरकारने सगासोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला असून तो मला देण्यात आला आहे. राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणपत्र सापडली आहेत, त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल, असे जरांगे पाटील यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षण चे काम केले आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्य पिंजून काढले. राज्यातील विविध भागात, गावा-खेड्यात सभा घेत त्यांनी आंदोलन तीव्र केले होते. अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. आज सकाळी वाशी येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार असून त्यानंतर विराट सभा घेण्यात येणार आहे. त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण