AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता.

मोठी बातमी! कबुतरांना दाणापाणी नाहीच! बंदी कायम; कोर्टाचा मोठा निर्णय!
mumbai court on pigeon food
| Updated on: Aug 07, 2025 | 4:22 PM
Share

Mumbai Kabutar Khana : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतराखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंत जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले होते. दरम्यान, आता न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निकाल देताना न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे?

मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यांवर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. सोबतच हा निर्णय देतावा आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिलाय. तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध

दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यावर बंदी कायम ठेवल्याने कबुतरखाने सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमका आरोप काय होता?

मुंबईतील कबुतराखाने सध्या बंद करण्यात आले आहेत. पालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे कबुतरखाने चालू करावेत या मागणीसाठी 4 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतल्या जागा आणि चौक हडपण्यासाठी हा कट रचला जातोय, असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यानंतर कबुतरखाने चालू करण्याची मागणी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता. मात्र न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.