AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी दगडफेक ते पोलिसांची धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नेमकं काय घडलं?

वांद्रे येथे गरीब नगरात अतिक्रमण केलेल्या ठिकाणावर तोडक कारवाई केली जात आहे. या ठिकाणी स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. विरोध केल्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

मोठी दगडफेक ते पोलिसांची धरपकड, वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नेमकं काय घडलं?
bandra encroachmentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 6:06 PM
Share

Bandra Encroachment Action : वांद्रा येथे रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात आहे. वांद्र्यातील गरीब नगर परिसरात ही कारवाई केली जात आहे. परंतु ही कारवाई करत असताना येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या या तोडक कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली आहे. उत्तरादाखल पोलिसांनीही लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्ज आणि दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली असून पोलिसांच्या उपस्थितीत तोडक कारवाई केली जात आहे.

तोडक कारवाईदरम्यान काय झालं? लाठीचार्ज का केला?

तोडक कारवाई केली जात असताना गरीब नगर भागात लोकांची मोठी गर्दी जमली होती. या तोडक कारवाईला विरोध केला जात होता. लोकांनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. यावेळी ज्या ठिकाणाहून पोलिसांवर दगड भिरकावले जात होते, त्याच ठिकाणी जाऊन पोलिसांनी तरुणांची धरपकड केली. मिळालेल्या माहितीनुसार साधारण पंधरा ते वीस मिनिटांपासून दगड साठवले जात होते. त्यानंतर हे दगड पोलिसांवर भिरकावण्यात आले.

टप्प्याटप्प्याने तोडक कारवाई सुरू

एकीकडे पोलिसांवर दगड भिरकावले जात असताना दुसरीकडे तोडक कारवाई मात्र थांबवण्यात आलेली नव्हती. सकाळपासून टप्प्याटप्प्याने तोडक कारवाई केली जात आहे. आता ज्या-ज्या तरुणांनी दगडफेक केली त्या तरुणांना पोलिसांकडून पकडले जात आहे. साधारण 50 ते 60 पोलिसांचे पथक या दगडफेकीला सामोरे गेले.

घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गरीब नगर परिसरात रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. हेच अतिक्रमण आता हटवले जात आहे. पुढचे काही दिवस हे अतिक्रमण सुरू राहणार आहे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे, असा आरोप केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Follow Us
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा.