AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं, म्हणाले,… यांच्या बळावर निस्तनाबूत करणार

आज सत्ता तुमची आहे. उद्या आमचीपण येईल.

अंबादास दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं, म्हणाले,... यांच्या बळावर निस्तनाबूत करणार
अंबादास दानवे यांनी उपस्थित केला सवाल Image Credit source: social media
| Updated on: Oct 05, 2022 | 7:53 PM
Share

मुंबई : ठाकरे गटांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. दानवे म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांना मस्ती आली आहे. मुंबईचा एक आमदार सुर्वे सांगतो. कोणाचेही हातपाय तोड, मी तुला जामीन देतो. हिंगोलीचा आमदार संतोष बांगर यांनी मध्यान भोजन प्रकरणी कॅमेऱ्यासमोर मारहाण केली. साधा गुन्हासुद्धा नोंद नाही. सदा सरवणकर दिवसा गोळ्या झाडतो, असं म्हणतात. बुलडाण्याचा आमदार संजय गायकवाड म्हणतो गीन गीन के मारेंगे. त्याच्यावरही कारवाई झाली नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्ता राहिली नाही, असा आरोप दानवे यांनी केला.

अंबादास दानवे म्हणाले, पोलिसांमध्ये काही हरामखोराची औलाद पैदा होत असते. नवी मुंबईचा डीसीपी शिवसेनेच्या नगरसेवकाला जर तू शिंदे गटात आला नाही तर तुझं इनकाउंटर करेन, अशी धमकी देतो. मी पोलिसांना इशारा देऊ इच्छितो. आज सत्ता तुमची आहे. उद्या आमचीपण येईल. मग, असं वागण तुम्हाला चालेल का, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

अब्दुल सत्तार याच्या मतदारसंघात ग्रामपंचायतच्या चौकात औरंगजेबाचं नाव ठेवण्याचा ठराव घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली. हिंदुत्वाच्या नावावर हे काय चाललंय, असं ते म्हणाले.

राज्य सरकारनं डाळ, तेल, साखर शंभर रुपयांत देण्याची घोषणा केली. 513 कोटी रुपयांचं टेंडर कशा पद्धतीनं निघालं. 100 रुपयांएवजी घरपोच अन्नधान्य वाटप करा. डीबीटीच्या माध्यमातून मदत करा. या टेंडरची चौकशी करा, अशी मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी केली.

नाशिकहून जनता आली. काही लोकं महिलांना पाहून अश्लील चाळे करत होते. शिवसेनेच्या रणरागिनींनी त्यांचं थोबाड फोडलं, असं दानवे यांनी सांगितलं.

समोरचे लोकं म्हणतात. माझ्याकडं 50 खोके आहेत. माझ्याकडं 50 आमदार आहेत. सुरत आहे. गुवाहाटी आहे. पण, माझ्याकडं उद्धव ठाकरे आहेत. या ठाकरेंच्या बळावर मी तुम्हाला निस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.