AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी फुटली त्या दिवशी या मोठ्या नेत्याचा अनिल देशमुख यांना आला होता फोन

अनिल देशमुख यांना अजित पवार गटाकडून मंत्रीपदाची ऑफर होती. प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख यांना संपर्कसुद्धा साधला होता.

राष्ट्रवादी फुटली त्या दिवशी या मोठ्या नेत्याचा अनिल देशमुख यांना आला होता फोन
| Updated on: Jul 10, 2023 | 4:46 PM
Share

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी आपल्यासोबत कोण येऊ शकते, याची चाचपणी केली. बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिंदे-भाजप गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी बऱ्याच आमदारांना फोन केले होते.

प्रफुल्ल पटेल यांनी साधला संपर्क

अनिल देशमुख यांना अजित पवार गटाकडून मंत्रीपदाची ऑफर होती. प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख यांना संपर्कसुद्धा साधला होता. शपथविधीच्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

जे कोणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्यासोबत गेलेत, त्यांना ऑफर देण्यात आली होती. मलासुद्धा ऑफर देण्यात आली होती. कारण जास्तीतजास्त आमदार त्यांच्यासोबत यायला हवेत, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.

शपथविधीच्या दिवशी साधला संपर्क

परंतु, काही आमदार अजित पवार गटात गेले, काही आमदार गेले नाहीत. आम्ही निर्णय घेतला होता की, शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहणार. ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी संपर्क साधला गेला. शपथविधीच्या एका दिवशीसुद्धा संपर्क केला होता. त्यावेळी असं सांगितलं नव्हतं की शपथविधी आहे म्हणून.

तुम्ही लवकरात लवकर मुंबईला पोहचा, असा निरोप आला होता, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांच्या खुलाशानंतर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या दोघांनी मिळून सर्व जुळवाजुळव केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.