AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर पाणी संकट, आठवडाभर मोठी पाणीकपात, पालिकेच्या पाणी साठ्याच्या सुचना

मुंबईला पाणी संकटाला तोंड द्यावं लागणार नाही (Water shortage in Mumbai). संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

मुंबईवर पाणी संकट, आठवडाभर मोठी पाणीकपात, पालिकेच्या पाणी साठ्याच्या सुचना
| Updated on: Nov 30, 2019 | 11:09 PM
Share

मुंबई : कधीही न थांबणारं शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत कोट्यावधी लोक राहतात. या सर्वांच्याच काही मुलभूत गरजाही असतात. पाणी ही त्यातीलच एक मुलभूत गरज. मात्र, 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान मुंबईला पाणी संकटाला तोंड द्यावं लागणार नाही (Water shortage in Mumbai). या आठवड्यात संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम करण्याचा निर्णय घेण्यात आला (Water shortage in Mumbai). त्यामुळे ही पाणी कपात होणार आहे.

मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा अंदाज घेऊन मुंबईकरांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन केले आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा 7 धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.

नव्या धोरणानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाईल. महापालिका प्रशासनाने याबाबत स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.