AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपने राम कदम यांना एकटे पाडलेय’

मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या […]

'भाजपने राम कदम यांना एकटे पाडलेय'
ram kadam
| Updated on: Oct 05, 2020 | 4:14 PM
Share

मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या आमदार राम कदम आणि इतर भाजप नेत्यांचा समाचार घेतला. (Pratap sarnaik slams Ram Kadam)

प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, भाजपचे प्रवक्ते राम कदम यांना त्यांच्याच पक्षाने एकटे पाडले आहे. सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली होती, असा अहवाल ‘एम्स’ने दिल्यानंतर आता सगळे टीकाकार कुठे गेले? तसेच गुप्तेश्वर पांडे नावाचा अधिकारी कुठे गेला?, असा सवाल सरनाईक यांनी विचारला. गुप्तेश्वर पांडे बिहारमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, ‘एम्स’च्या अहवालामुळे ते ‘उघडेश्वर पांडे’ झाले आहेत, अशी टीकाही प्रताप सरनाईक यांनी केली.

तसेच यावेळी प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सुशांत सिंह याचे कुठल्या कलाकारांसोबत संबंध होते, याची माहिती मुंबई पोलिसांनाही होती. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट गोष्टी सांगायच्या नसतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये भाजप आमदार राम कदम आघाडीवर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. भाजप नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात आला होता. हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का होता. परंतु, आता सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली, असा अहवाल दिल्यामुळे महाविकासआघाडीवर टीका करणारे नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

संबंधित बातम्या:

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

(Pratap sarnaik slams Ram Kadam)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.