AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपने राम कदम यांना एकटे पाडलेय’

मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या […]

'भाजपने राम कदम यांना एकटे पाडलेय'
ram kadam
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 05, 2020 | 4:14 PM
Share

मुंबई: सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे लोक आता गायब झाले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनाही त्यांच्या पक्षाने एकटे पाडले आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात शिवसेनेविरोधात आरोपांची राळ उडवून देणाऱ्या आमदार राम कदम आणि इतर भाजप नेत्यांचा समाचार घेतला. (Pratap sarnaik slams Ram Kadam)

प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, भाजपचे प्रवक्ते राम कदम यांना त्यांच्याच पक्षाने एकटे पाडले आहे. सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली होती, असा अहवाल ‘एम्स’ने दिल्यानंतर आता सगळे टीकाकार कुठे गेले? तसेच गुप्तेश्वर पांडे नावाचा अधिकारी कुठे गेला?, असा सवाल सरनाईक यांनी विचारला. गुप्तेश्वर पांडे बिहारमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, ‘एम्स’च्या अहवालामुळे ते ‘उघडेश्वर पांडे’ झाले आहेत, अशी टीकाही प्रताप सरनाईक यांनी केली.

तसेच यावेळी प्रताप सरनाईक यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सुशांत सिंह याचे कुठल्या कलाकारांसोबत संबंध होते, याची माहिती मुंबई पोलिसांनाही होती. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वाईट गोष्टी सांगायच्या नसतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये भाजप आमदार राम कदम आघाडीवर होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. भाजप नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात आला होता. हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का होता. परंतु, आता सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्याच केली, असा अहवाल दिल्यामुळे महाविकासआघाडीवर टीका करणारे नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

संबंधित बातम्या:

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

(Pratap sarnaik slams Ram Kadam)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...