AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha elections: भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून येणारच, शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार, भाजपाच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांना विश्वास

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election)भाजपाने चांगलीच कंबर कसलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून (BJP third candidate will win)येणारच असा विश्वास भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या निवडणुकींच्या रणनीतीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. भाजपाचा उमेदवार निवडून येणार आणि शवसेनेच्या […]

Rajya Sabha elections: भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून येणारच, शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार, भाजपाच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांना विश्वास
BJP meetingImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 05, 2022 | 5:38 PM
Share

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election)भाजपाने चांगलीच कंबर कसलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार निवडून (BJP third candidate will win)येणारच असा विश्वास भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत या निवडणुकींच्या रणनीतीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. भाजपाचा उमेदवार निवडून येणार आणि शवसेनेच्या संजयचा पराभव होणार, असे सांगत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या संख्याबळाची रणनीती, योजना मुंबईतील बैठकीत पार पडल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला कोरोना झालेला असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित होते.

तबेल्यात राहणाऱ्यांना दिसतो घोडेबाजार

जे दररोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार असा आरोप करीत आहेत, ते तबेल्यात राहतात, अशी टीका त्यांनी संजय राूत यांच्यावर केली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याची टीका शिवसेनेसह इतरही काही पक्ष करीत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेपेक्षा भाजपाकड जास्त मते होती, तरीही शिवसेनेने ही निवडणूक लादली, असे सांगत आगे आगे देखो होता है क्या, असे शेलार यांनी सांगितले आहे.

पराभव समोर दिसतोय म्हणून आरोप

काही अपक्ष आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव आणण्यात येतो आहे, असा आरोप शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना राऊतांचं हे विधान बालिश, पोरकटपणाचे आणि मुद्दामहून वेडसरपणाचे असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत, असेही शेलार म्हणाले. पराभव समोर दिसत असल्याने आत्तापासूनच त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेची स्वत:च्या आमदारांनाच नजरकैद

शिवसेनेला स्वताच्या आमदारांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. स्वताच्या पक्षाच्या आमदारांना नजरकैदेत ठेवणारे लोकशाहीवर बोलतात, हा काय प्रकार आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांवर विश्वास नसणाऱ्या महाविकास आघाडीकडून त्यांचा अपमान करण्यात येत असल्याची टीकाही शेलार यांनी केली. भाजपाचे काही आमदार संपर्कात असल्याच्या सतेज पाटील यांच्या वक्तव्यावर, कोल्हापुरातील त्यांचे आमदार त्यांनी आधी सांभाळावेत असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे. एकूणच राज्यसभा निवडणूक ही शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ही निवडणूक पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारीही ठरणार, हे नक्की.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.