AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबईत आणखी दोन वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी आणि कुर्ल्याचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.

अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार
bmc
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 5:48 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबईत आणखी दोन वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी आणि कुर्ल्याचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वॉर्डांची संख्या आता 24 वरून 26 होणार आहे.

विशेष म्हणजे महापालिका प्रशासनानेच दोन प्रभागांच्या विभाजानाचा प्रस्ताव मांडला आहे. अंधेरी पूर्व (के/पूर्व) आणि कुर्ला (एल) हे दोन्ही वॉर्ड अत्यंत मोठे आहेत. प्रशासकीय कामकाजासाठीही ते गैरसोयीचे असल्याने या दोन्ही वॉर्डांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला आहे. छोटे वॉर्ड असल्याच प्रशासकीय सोयीसाठी आणि जनतेच्या कामासाठी त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो, त्यामुळेच या दोन्ही वॉर्डच्या विभाजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

समितीच्या अहवालानंतर निर्णय

दरम्यान, या दोन वॉर्डाचे विभाजन करण्यासाठी महापालिकेने आधी समिती नेमली होती. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आणि भारत मराठे यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल सादर केला होता. वॉर्डातील लोकसंख्या, सुविधा, प्रशासनावर येणारा ताण, नागरिकांची होणारी गैरसोय आदी मुद्द्यांचा या समितीने अभ्यास करून के पूर्व आणि ‘एल’ विभागाचे विभाजन करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत आला आहे.

या वॉर्डाची होणार विभागणी

एल वॉर्ड हा मोठ्या वॉर्डपैकी एक समजला जातो. या वॉर्डात एकूण 16 नगरसेवक येतात. या वॉर्डात सुमारे नऊ लाख लोक राहतात. त्यामुळे एल दक्षिण आणि एल उत्तर असे दोन वॉर्ड करण्यात येणार आहे. एका वॉर्डाची इमारत कुर्ला (पश्चिम) डेपोजवळ आहे तिथेच राहील. तर नव्या वॉर्डाची इमारत चांदिवली येथे करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे चांदिवली आणि परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी कुर्ल्यात येण्याची गरज पडणार नाही. या शिवाय के पूर्व या विभागाचे के दक्षिण व के उत्तर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव आहे. के पूर्वमध्ये 15 नगरसेवक येतात. के पूर्वमध्ये 8 लाख 23 हजार लोक राहतात. तर, पी उत्तर (मालाड ) या वॉर्डाचे मालाड पूर्वेला पी पूर्व तर मालाड पश्चिम म्हणजे पी पश्चिम असे दोन वॉर्ड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अशी होणार प्रक्रिया

गटनेत्यांच्या बैठकीत वॉर्डाच्या विभाजनावर चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर हा प्रस्ताव महापालिका महासभेत मांडला जाईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर दोन वॉर्डांची विभागणी केली जाऊन नवे वॉर्ड अस्तित्वात येतील.

संबंधित बातम्या:

VIDEO: पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

PM Security Breach: 500 शेतकरी मरण पावले, त्यासाठी कुणाला फासावर लटकवायचे?; राऊतांचा सवाल

शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली