AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीच्या जागेबाबत षडयंत्र झालंय, शोधून…; विश्वजीत कदम यांच्या वक्तव्याने खळबळ

Congress Leader Vishwajeet Kadam on Sangali Loksabha Election 2024 : लोकसभा निवणुकीत विविध घडामोडी घडत आहेत. अशात पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा असणाऱ्या सांगलीतील राजकीय समिकरणं बदलली आहेत. यावर काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी भाष्य केलं आहे. वाचा...

सांगलीच्या जागेबाबत षडयंत्र झालंय, शोधून...; विश्वजीत कदम यांच्या वक्तव्याने खळबळ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 01, 2024 | 4:29 PM
Share

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बरीच चर्चा झाली. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. पण काँग्रेसचे स्थानिक नेते या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी जागेसाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपात बदल न झाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं. या सगळ्यावर विश्वजीत कदम यांनी भाष्य केलं आहे.

सांगलीच्या जागेवर काय म्हणाले?

सांगली लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा होता. पण काहीतरी सांगलीत शिजलं आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडून गेली आहे. आमचा सांगली जिल्ह्यावरचा दावा कोणीही संपुष्ठात आणू शकत नाही. त्यामुळे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा आहे. आता काहीतरी षडयंत्र हे सांगलीच्या बाबतीत घडलं आहे. त्यामुळे जी जागा ठाकरे गटाकडे गेली. पण आम्ही हे षडयंत्र शोधून काढणार आहोत, असं विश्वजीत कदम म्हणाले.

विशाल पाटील हे आमच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारवाई च्या संदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. पण विशाल पाटील असू दे किंवा मी आम्ही सांगलीत काँग्रेस वाढवण्याच काम केलं आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.

शरद पवार हे राज्याच्या राजकारणात गेल्या 55 वर्षापासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असे वैयक्तिक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करणं, हे चुकीचं आहे. या टीकेमुळे समजून येत आहे की, राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळूही सरकली आहे, असं विश्वजीत कदमांनी म्हटलं आहे.

कोल्हापूरच्या लढतीवर काय म्हणाले?

यंदा शाहू महाराजांना कोल्हापूरची जनता ही निवडून देईल, हा विश्वास आहे. कारण कोल्हापूरच्या जनतेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक धरण,शाळा आणि कॉलेज बांधले त्यामुळे जनता त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसा वरुण सुद्धा टीका ही सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. या टीकेमुळे सत्ताधारी किती अस्वस्थ आहेत हे दिसून येत आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!