AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रीपदे? हे आहेत दावेदार, पालकमंत्रीपदासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच

Devendra Fadnavis Cabinet Expansion: ठाणे लोकसभेत भाजप आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे प्रमुख दावेदार आहेत. कल्याण लोकसभा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची पुन्हा मंत्रिपदी निवड होईल.

ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रीपदे? हे आहेत दावेदार, पालकमंत्रीपदासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 13, 2024 | 9:10 AM
Share

Devendra Fadnavis Cabinet Expansion: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या विस्तारासाठी महायुतीमध्ये सूत्रही ठरले आहे. भाजपला २० ते २१ मंत्रिपद मिळणार असून शिवसेनेच्या वाटेला १० ते १२ मंत्रिपद येणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ८ ते १० मंत्रिपद दिले जाणार आहे. या विस्तारात ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे, कल्याण, भिवंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक मंत्री केला जाऊ शकतो.

हे आहेत दावेदार

ठाणे लोकसभेत भाजप आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे प्रमुख दावेदार आहेत. कल्याण लोकसभा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची पुन्हा मंत्रिपदी निवड होईल. भिवंडी लोकसभा मतदार संघातून भाजप आमदार किसन कथोरे याचा विचार केला जाऊ शकतो. कथोरे याचा देखील पक्षात मजबुत स्थान आहे. जिल्ह्यात भाजपने उभे केलेले सगळे नऊजण चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा जण निवडून आले आहेत. परंतु भाजपचा स्ट्राईक रेट जास्त आहे. तो पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाटेला जास्त पदे जाऊ शकतील. पण ठाण्यात पाळेमुळे रुजलेल्या शिंदेसेनेला हे कितपत रुचेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

पालकमंत्रीपद कोणत्या पक्षाला?

दरम्यान, ठाणे हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे भाजपला देखील ठाण्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर दावा केला होता. परंतु ती जागा शिवसेनेला दिली. आता पालकमंत्रीपद शिवसेनेला न देता भाजपकडे ठेवावे, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ठाण्याचा गड दोन्ही पक्षांना आपल्याकडे हवा आहे. आता त्यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात? त्याकडे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा