AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 च्या हल्ल्यात शस्त्रांचं घबाड शोधून देणारा तारा निखळला, कॅनिंग सैनिक ‘नॉटी श्वाना’चा मृत्यू

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिकाचं निधन झालं आहे (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar)

26/11 च्या हल्ल्यात शस्त्रांचं घबाड शोधून देणारा तारा निखळला, कॅनिंग सैनिक 'नॉटी श्वाना'चा मृत्यू
कसाबने लपवलेला शस्त्रसाठा शोधून काढणारा कॅनिंग सैनिक कालवश, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मौल्यवान कामगिरी करणारा तारा निखळला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 12, 2021 | 6:04 PM
Share

पालघर : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्रीचा दहशतवादी हल्ला (26/11 Mumbai Attack) मुंबईकर कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी मारली. अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या हल्ल्यावेळी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या एका श्वानाचं निधन झालं आहे. या श्वानाचं नाव नॉटी असं आहे. त्याने सोमवारी (10 मे) अखेरचा श्वास घेतला. तो 14 वर्षांचा होता (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar).

2014 मध्ये सेवा निवृत्त

पालघरमधील सफाळे येथील माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा 2014 मध्ये सेवा निवृत्त झाला होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. नॉटी अचानक आजारी पडला. त्याचं वय 14 वर्ष इतकं पूर्ण झालं होतं. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटीने शौर्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होत (26/11 Hero dog Nauty who play important role dies in Palghar).

मुंबईत दहा ठिकाणी दहशतवादी हल्ले

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात हल्ले झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट घडवून आणला होता.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांनी मुबईवर हल्ला करण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्यदलाला तीन दिवसानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

हल्ले करणाऱ्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.

हेही वाचा : कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली