AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र? अंबादास दानवे यांच्या त्या वक्तव्याची तुफान चर्चा, राजकारण कूस बदलणार?

Eknath Shinde and Uddhav Thackeray : शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांना पक्षाचे विभाजन आजही खटकते. सर्वच शिवसैनिकांनी एक व्हावे असे त्यांना वाटते. 'संघशक्ति: कलयुगे'वर त्यांनी भर दिला.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र? अंबादास दानवे यांच्या त्या वक्तव्याची तुफान चर्चा, राजकारण कूस बदलणार?
दोन्ही शिवसेना एकत्र येणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 20, 2025 | 1:18 PM
Share

राज्याच्या राजकारणात सध्या चढउतार दिसून येत आहे. त्याचे विविध परिणाम आणि परिपाक आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 18 वर्षांनी एकाच मंचावर आले. तर आता शिवसेनेची दोन शक्कलं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कधी एकत्र येतो याची पण चर्चा सुरू आहे. सध्या या दोन्ही गटातून विस्तव सुद्धा जात नाही. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सत्कार समारंभात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. पण तरीही दोन्ही गटांनी एकत्र येण्याची चर्चा होत आहे.

सेनेच्या फुटीमुळे दानवे नाराज

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना सेनेतील ही फूट जिव्हारी लागलेली आहे. या फुटीवरून ते नाराज आहेत. एका मजबूत पक्षाची अशी शक्कलं होणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांना वाटते. दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवे असे त्यांना वाटते.

पीटीआयने म्हटल्यानुसार, दानवे यांनी पक्ष फुटीवर भाष्य केले आहे. आम्ही काही सत्तेसाठी पैदा झालेलो नाही. सत्ता तर येते आणि जाते. पण संघटनेची एकजुटता हीच सर्वात मोठी ताकद आहे. कोणाची तरी शिवसेनाला नजर लागली आणि संघटना फुटली. हा घाव, ही जखम भरायला हवी. तो घाव भरून निघायला हवा, असे मोठे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. एकजूटता हीच शिवसेनेची ताकद आणि ओळख होती. सर्व शिवसैनिकांनी एकत्र यायला हवे असे ते म्हणाले.

शिवसेनेतील फुट मोठी घटना

शिवसेनेत वर्ष 2022 मध्ये मोठा राजकीय भूकंप आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 39 आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि वेगळा गट तयार केला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपासह सरकार स्थापन केले. पुढे या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट सहभागी झाला. पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. महाविकास आघाडीनंतर राज्यात महायुतीचा प्रयोग जनतेने पाहिला. पण शिवसेनेतील उभी फुट आजही अनेक शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलेली आहे, हे स्पष्ट होते.

शिवसेना पुन्हा मजबूत करा

अंबादास दानवे यांनी सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. पक्ष सत्तेत असावा अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली. एक शिवसैनिक म्हणून शिवसेना पुन्हा मजबूत आणि पक्ष म्हणून पुढे यायला हवी. एकतेची आशा करणे वाईट नसल्याचे ते म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...