AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते’, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांचा दावा

होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि कोरोनाचा मुकाबला केला जाऊ शकतो (Homeopathy boosts the immune system), असा दावा होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे.

'होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते', होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांचा दावा
| Updated on: Apr 27, 2020 | 5:36 PM
Share

मुंबई : होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि कोरोनाचा मुकाबला केला जाऊ शकतो (Homeopathy boosts the immune system), असा दावा होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी होमिओपॅथी हा उत्तम पर्याय असल्याचं आयुष मंत्रालयानेदेखील सांगितलं आहे. त्यानंतर मुंबईतील ‘वेलकम क्युअर’ संस्थेने मोफत होमिओपॅथी औषधे वाटण्यास सुरुवात केली आहे (Homeopathy boosts the immune system).

“‘वेलकम क्युअर’ संस्थेमार्फत जवळपास आठ हजार नागरिकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली आहेत. या आठ हजार व्यक्तींच्या अभ्यासातून त्यांच्यापैकी कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे होमिओपॅथी कोरोनाला पूर्णपणे बरं करु शकत नाही. मात्र कोरोना होण्यापासून वाचवू शकतं”, असा दावा डॉ. जवाहर शहा यांनी केला आहे.

“जगभराची एकूण लोकसंख्या ही 700 कोटी आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त व्हायरस, पॅसेसाईट्स, फंगाय आणि बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतात. तरीदेखील आपल्याला त्रास होत नाही. कारण आपली रोगप्रतिकार क्षमता मजबूत असते. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता मजबूत असायला हवी. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होमिओपॅथी हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे. आयुष म्हणजे आयुर्वेदिक, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. या सर्वांचं योग्य समन्वयसाधून औषध घेतलं आणि पथ्य पाडले तर रोगप्रतिकार क्षमता वाढेल”, असं डॉ. जवाहर शहा म्हणाले.

“मी गेल्या 45 वर्षांपासून काम करत आहे. मी आतापर्यंत श्वसनाचा विकार असणाऱ्या हजारो रुग्णांवर उपचार केला आहे. मी पूर्ण अभ्यास केला आणि औषधांची एक किट बनवली आहे. ही औषधे फक्त तीन दिवस घ्यायची आहेत. या औषधांचं आतापर्यंत आठ हजार पेक्षाही जास्त किटचं वाटप करण्यात आलं आहे”, असं डॉ. जवाहर शहा यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, यवतमाळ, पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनारुग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे लागून असलेल्या जुहू गल्लीतील एका चाळीत तीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांना नायर, नानावटी आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लालबागमध्ये सर्वेक्षण करताना चार आरोग्य सेविकांना कोरोनाची लागण झाली आहेत. त्याशिवाय एशियन रुग्णालयातील 31 कर्मचाऱ्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यात 8 नर्स आणि 23 बाहेरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

पाऊस तोंडावर, पण कापूस पडून, खरेदी न केल्यास 30 एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, बीएमसीने कारवाईचा बडगा उगारताच बंद नर्सिंग होम सुरु

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.