AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडा, अन्यथा काडीमोड; महायुतीमध्ये पहिली ठिणगी, अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा

Mahayuti BJP-NCP Dispute : ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक घाडमोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये फटाके वाजत आहे. बटोंगे तो कटोंगे आणि एक है तो सेफ है या मुद्दांवर घरचा आहेर मिळाल्यानंतर आता मित्रपक्षांनी पण भाजपाचे कान टोचले आहे. वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीत सहभागी न होण्याचा इशाराच अजितदादा गटाने दिला आहे.

वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडा, अन्यथा काडीमोड; महायुतीमध्ये पहिली ठिणगी, अजितदादांच्या शिलेदाराचा भाजपाला थेट इशारा
महायुतीत पहिली ठिणगी
| Updated on: Nov 15, 2024 | 10:21 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. मतदानाला उणेपुरे पाच दिवस उरले आहेत. त्यातच भाजपाने हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याने महायुतीमधील एक गट नाराज झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. मराठा-ओबीसी या वादाला काऊंटर करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले. तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे.

बटेंगे तो कटेंगे

भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील जाहीर सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. भाजपाने निवडणुकीत हिंदूत्व कार्ड खेळल्याचे मानले जात होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचार सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने या दोन्ही नाऱ्यावर सडकून टीका केली.

तर दुसरीकडे महायुतीच या घोषणेवरून ठिणगी पडली. अजितदादांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकरांचा आहे. येथे शिवरायांची शिकवण आहे. साधु-संतांची पंरपरा आहे. राज्यात अशा वक्तव्याला थारा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पण असेच वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा दिला. तर आता अजितदादांच्या शिलेदाराने थेट काडीमोड घेण्याचा इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांचा थेट इशारा

मानाखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात महायुतीतच टफ फाईट आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नवाब मलिक या मतदारसंघातून मैदानात उतरले आहे. नवाब मलिक यांनी बटोंगे तो कटोंगे या नाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपाने वादग्रस्त मुद्दावर राजकारण थांबवलं नाही तर आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू असा थेट इशाराच त्यांनी दिला. टीआयओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर रोखठोक विचार मांडले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.