AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 65% मतदान, महिला मतदारांचा कौल यंदा निर्णायक ठरणार; वाढलेल्या मतांचे लाभार्थी कोण?

Vidhansabha Election 2024 Women Voting Percentage : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत आहे. काल राज्यभरात मतदान झालं. काल 65.02 टक्के झालं. यात महिला मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिला मतदारांचं मतदान कोणाच्या बाजूने झुकणार? वाचा सविस्तर बातमी...

राज्यात 65% मतदान, महिला मतदारांचा कौल यंदा निर्णायक ठरणार; वाढलेल्या मतांचे लाभार्थी कोण?
| Updated on: Nov 21, 2024 | 1:09 PM
Share

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. काल मतदान झालं आहे. शनिवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात 65. 02 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने मतदान करणार? यावर सत्तास्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे. महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर यंदा मतदान केलं आहे. त्यामुळे महिलांची मतं कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेला हा मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

महिला मतदारांचं मतदान निर्णायक ठरणार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. महिलांनी केलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं दिसतं. पण अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे. प्रतिमहिना तीन हजार रूपये महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिला आहे. त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच पहिल्यांदा मतदान करणारी तरूण पिढी कुणाच्या बाजूने कौल देणार? यावर निकाल अवलंबून असेल.

पुणे जिल्ह्यात मतदानात वाढ

पुण्यात यंदा मतदानाच्या टक्केवारी वाढ झाली आहे. वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांत सरासरी ६९ टक्के मतदान झालं आहे. तर शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा सहा टक्के मतदान शहरात वाढले आहेत. सर्वाधिक ७६.९३ टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल बारामती आणि मावळ मतदारसंघात ७२ टक्के मतदान झाले आहे.

नाशिकमध्ये किती टक्के मतदान?

विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात 67.97 टक्के मतदान झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 05.37 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन माजी मंत्री, एक विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासह 196 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. सर्वाधिक 78.01 टक्के मतदान दिंडोरी मतदार संघात झालं आहे. तर सर्वात कमी 56.08 टक्के मतदान नाशिक मध्य मतदारसंघात झालं आहे. 2019 मध्ये महिलांचे मतदान 56.06 टक्के, तर 2024 मध्ये महिलांचे मतदान 66.96 टक्के होते. महिलांच्या मतदानामध्ये यंदा 9.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.