AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पावसात गांडूळ जन्मला येतं, पाऊस संपला गांडुळांचं अस्तित्व संपून जातं”; शिंदे गटाची तुलना गांडुळाबरोबर कुणी केली…

बाळासाहेब ठाकरे यांनी विचारले की, ते दगड का बुडत आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या अतिशहाणा संजय राऊत यांनी उत्तर दिले की, तो दगड बुडत आहे कारण, त्या दगडाने बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहे.

पावसात गांडूळ जन्मला येतं, पाऊस संपला गांडुळांचं अस्तित्व संपून जातं; शिंदे गटाची तुलना गांडुळाबरोबर कुणी केली...
| Updated on: Jan 23, 2023 | 9:42 PM
Share

मुंबईः बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यावरून शिंदे गटाने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यावर बोलताना सांगितले की, शिवसेना अखंड आणि अभंग आहे.

शिवसेनेचा गौरव करताना संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले की, देशात शिवसेना ही फक्त आता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच ओळखले जाते. शिंदेमिंदे यांच्यामुळे शिवसेना वगैरे काही ओळखल जात नसल्याचे टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टाकी करताना म्हणाले की, ही शिवसेना एकच आहे, देशात दुसरी शिवसेना निर्माण होऊच शकत नाही.

ज्या लोकांनी शिवसेना संपवण्याची कटकारस्थानं केली आहेत. त्यांना सांगावं वाटतं की आता भविष्य हे फक्त शिवसेनेचे असेल असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शिवसेना संपवण्याची जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही. कारण ही शिवसेना त्याग आणि बलिदानातून उभा राहिली आहे.

त्यामुळे रक्त सांडून उभा केलेली ही शिवसेना कधीच संपणार नाही असंही त्यांनी ही सांगितली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, काही लोकं आता वडिलही चोरले जात आहेत.

त्यावर संजय राऊत म्हणाले की, लोकं वडिल चोरू शकत नाहीत, ज्या प्रमाणे देवाच्या मूर्ती चोर लोक चोरतात तेव्हा ती लोकं त्या मुर्तीची मंदिर नाही बनवत तर ती लोकं ती देवाची मूर्ती विकत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देताना म्हणाले की, एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी पाण्यात दगड फेकला मात्र तो दगड बुडू लागला.

त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी विचारले की, ते दगड का बुडत आहेत. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या अतिशहाणा संजय राऊत यांनी उत्तर दिले की, तो दगड बुडत आहे कारण, त्या दगडाने बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहे.

त्यामुळे ज्या चाळीस दगडांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडला आहेत, ते गाळत रुतल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....