AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mantralaya Mumbai: मंत्रालयात जाताय? मग पाण्याची बाटली नेता येणार नाही! मंत्रालयामध्ये पाणी बॉटलवर बंदी

पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्याचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे

Mantralaya Mumbai: मंत्रालयात जाताय? मग पाण्याची बाटली नेता येणार नाही! मंत्रालयामध्ये पाणी बॉटलवर बंदी
मंत्रालय..Image Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 7:28 AM
Share

मुंबई : मुंबईत (Mumbai News) अनेकदा मंत्रालयात वेगवेगळ्या कामासाठी राज्यभरातून लोक येत असतात. त्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे मंत्रालयामध्ये (Mantralaya) पाण्याची बाटली घेऊन जाता येणार नाही. मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी (Water bottle ban) घालण्यात आली आहे. त्यामुळे भेटीगाठींसाठी येणाऱ्यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची बाटली ठेवून आत जावं लागले. मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्याचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वेग आलेला असतानाच नव्या सरकारकडून कामंही सुरु झाली आहे. तीन कॅबिनेट बैठकाही झाल्या. काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले गेले. त्यात आता पाण्याच्या बंदीचाही आदेश घेण्यात आलाय.

आत्महत्यांची धास्ती?

अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचेही प्रयत्न झाले आहेत. काही जण पाण्याच्या बाटलीतून रॉकेल किंवा कीटकनाशक अन्यथा एखादं रसायन घेऊनही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठीही पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

गुटखाबंदी, पण भिंती बरबटलेल्या…

दुसरीकडे मंत्रालयात गुटखाबंदी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भेटीगाठींसाठी येणाऱ्यांच्या बॅग आणि खिशांची तपासणी होते. पान तंबाखूच्या पुड्या गेटवर काढून घेतल्या जातात. पण तरिही अनेकजण छुप्या मार्गाने तंबाखूच्या पुड्या मंत्रालयात घेऊन जात असल्याचंही दिसून आलंय. मंत्रालयातील स्वच्छतागृहात गुटखा खाऊन थुंकल्यानं बेसिन तुंबल्याचे प्रक्रार समोर आलेले होते.

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जनता मंत्रालयात येत असते. याआधीही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. मध्यंतरीही मंत्रालयात विष प्रशान करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होते. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आता खबरदारी घेतली जाते आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिण्याच्या पाण्याची पिंपं भरुन ठेवण्यात आली आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.