AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Ram Shinde on Meeting With Devendra Fadnavis : भाजप नेत्यांची 'सागर' बंगल्यावर महत्वाची बैठक; कोणते नेते उपस्थित होते? देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? राम शिंदे शिंदे यांनी या बैठकीबाबत महत्वाची माहिती दिली. वाचा सविस्तर...

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
देवेंद्र फडणवीस
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 25, 2024 | 9:54 AM
Share

लोकसभा निवडणूक होत आहे. अशात राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. मुंबईत काल रात्री उशिरा भाजपची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अहमदनगरमधील भाजपचे नेते उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे सागर बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणिस भाजप नेते हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राम शिंदे यांमी सविस्तर प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर लोकसभेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता अडचणीचं निराकरण झालं आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल दुःख आहे ते कोणीतरी समजून घेतलंय त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्या नगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली, असं राम शिंदे म्हणाले.

नाराजीच्या चर्चांवर शिंदे काय म्हणाले?

राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यावर पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असं राम शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस व्हेटो वापरला का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाही… माझ्यावर व्हेटो वापरायची गरज नाही. पक्षात आदेश हा शिरसावंद्य असतात. मागील पाच वर्षाच्या काळातील इतंभुत चर्चा झाली. आजची बैठक यशस्वी झाली. गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं, असं राम शिंदे म्हणाले.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा