AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील सर्वात मोठा तलाव पूर्णपणे कोरडा; आता कसा होणार पाणीपुरवठा? किती टक्के पाणी शिल्लक?

मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला असून शहरात केवळ ४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाहा सर्व तलावांमधील सद्यस्थिती.

मुंबईतील सर्वात मोठा तलाव पूर्णपणे कोरडा; आता कसा होणार पाणीपुरवठा? किती टक्के पाणी शिल्लक?
mumbai water
| Updated on: Jun 02, 2026 | 9:02 AM
Share

ऐन उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मुंबईकरांच्या डोक्यावर पाण्याचे मोठे संकट घोंगावू लागले आहे. मुंबई शहराची तहान भागवण्यात महत्त्वाचा वाटा असलेला आणि राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला आहे. या तलावातील उपयुक्त पाणीसाठा आता शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा प्रशासनाला संपूर्णपणे बंद करावा लागला आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये १ जूनपर्यंत या तलावात ७ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी शिल्लक होते. परंतु यावर्षी भीषण उन्हामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व ७ तलावांची सरासरी टक्केवारी पाहिल्यास, त्यात केवळ १५.५७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच सातही तलावांमध्ये मिळून २ लाख २५ हजार २९४ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. वाढता कडाका आणि पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, हा साठा मुंबई शहराला जेमतेम ४० ते ४५ दिवसच पुरू शकतो. त्यामुळे येत्या महिनाभरात पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर मुंबईवर तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होणार आहे.

उर्वरित ६ तलावांवर वाढला ताण; तानसाची स्थितीही चिंताजनक

अप्पर वैतरणा तलावातील पाणी आटल्याने मुंबई महानगरपालिकेची (BMC) डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईची तहान भागवण्याची जबाबदारी आता उर्वरित सहा तलावांवर आली आहे. त्यातही तानसा तलावाची पातळीही आता अवघ्या १० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे तानसातूनही पाणी उपसा कधीही बंद करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेले तुळशी आणि विहार हे तलाव आकाराने खूप लहान आहेत. त्यातून दररोज जेमतेम १५ ते १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो, जो मुंबईच्या एकूण गरजेच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.

आता केवळ भातसाचाच मोठा आधार

अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आता मुंबईकरांची मुख्य मदार राज्य सरकारच्या मालकीच्या भातसा तलावावर आणि पालिकेच्या मोडक सागर व मध्य वैतरणा तलावांवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा भातसा तलावाचा आहे. भातसा तलावामध्ये सध्या १ लाख ७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. त्यातून दररोज सुमारे १ हजार ७०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी सोडले जात आहे.

पण जर पावसाचे आगमन लांबले, तर केवळ भातसा आणि मोडक सागरच्या भरवशावर मुंबईत पाणी पुरवठा होणे, हे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. मुंबईतील पाणी कपातीचे संकट टाळण्यासाठी आता केवळ पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तलावांमधील सद्यस्थिती (पाणीसाठा टक्केवारी)

तलावाचे नाव सध्याचा पाणीसाठा (%)
अप्पर वैतरणा ०% (पूर्णपणे कोरडा)
तानसा १०%
भातसा १५%
मध्य वैतरणा २२%
तुळशी २७%
मोडक सागर ३३%
विहार ४६%

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...