AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: सरकार शब्दाला जागलं… एक आदेश निघाला… उर्वरीत मागण्यांबाबत सुट्टी नाहीच.. मनोज जरांगेंचा सरकारला तो खणखणीत इशारा

Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate: मराठा आरक्षणातील प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. काल सरकारने एक आदेश काढला. आता जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे.

Manoj Jarange: सरकार शब्दाला जागलं... एक आदेश निघाला... उर्वरीत मागण्यांबाबत सुट्टी नाहीच.. मनोज जरांगेंचा सरकारला तो खणखणीत इशारा
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 02, 2026 | 8:51 AM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: मराठा आरक्षणासंदर्भातील काही प्रलंबित मागण्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत रणरणत्या उन्हात आमरण उपोषण केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईनंतर आंदोलन मागे घेतले. सरकारने दिलेल्या आश्वासनावर जरांगे यांचं समाधान झाले. सरकारने काल एक आदेशही काढला. तरीही जरांगे पाटील यांनी 58 लाख कुणबी नोंदीविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सरकारला अल्टिमेटमची पुन्हा एकदा आठवण करून दिली.

मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना MIDC मध्ये नोकरी

मयत आंदोलकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात नोकरी देण्याचा शासनाने निर्णय काढला. त्याचे कौतुक करतो, अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. हे गरजेचं होतं. पण मी यात समाधानी नाही, मराठ्यांना आरक्षण दिलं असतं ते बलिदान गेलं नसतं, त्यांच्या चुकीमुळे हे बलिदान गेले आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

58 लाख नोंदीविषयी सरकारला इशारा

58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ पातळीवर निघणे खूप गरजेचे आहे. त्यांनी आज मंगळवारी काढावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत हे आदेश निघाला पाहिजे की 58 लाख नोंदणी झाल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या, नोंदी सापडून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर तुम्हाला बडतर्फ केलं जाईल, ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडीटी द्या (Manoj Jarange Patil on Kunbi Validity Certificate) ह्या सूचना काढणं खूप गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मंगळवारपर्यंत अल्टिमेट

सरकार दोन-तीन दिवसात करतो म्हटले. उलट त्यांनी एक निर्णय काढला म्हणल्यावर एक दिवस आधी काढलाय, त्यांनी गरीबाची मन जिंकावे असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. हैदराबाद गॅझेट संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश निघणे गरजेचे आहे. सातारा संस्थांचे गॅझेटर, कोल्हापूर, औंध, पुणे बॉम्बे गोरमेंटचे गॅझेटर याचा सुद्धा जीआर काढणे गरजेचे आहे. सूचना काढल्यानंतर आम्ही समाधानी असणार आहोत त्यांनी ते काम तातडीने हाती घ्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा