AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका

या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा

राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका
| Updated on: Nov 30, 2022 | 10:53 PM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लोकांच्या मनात राग असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी नेहमी अपमानजनक बोलणाऱ्या राज्यपालांनी राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर जावं अशी खरमरीत टीकाही त्यांच्यावर त्यांनी केली.

भाजपकडून आणि त्यांच्या अनेक नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केले जाते. त्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या आहेत.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातून बाहेर जावं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकद नाही अशी चूक त्यांनी दुसऱ्यांदा केली आहे. त्यामुळे येथील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असंही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

महापुरुषांबद्दल तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल तर त्याला राज्यातून हा विरोध होणारच असंही रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

राज्यपालांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य हे एकदा नाही तर दोनदा केलं आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्र अजिबात खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रात राज्यपालांना होणारा विरोध हा एका व्यक्तीचा नाही तर तो येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राबाहेर जावं अशी इच्छा येथील जनतेची असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.