AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका

या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा

राज्यपाल पद सोडून आधी महाराष्ट्राबाहेर जावं, शिवरायांच्या वक्तव्यावरून या नेत्याची आक्रमक टीका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 30, 2022 | 10:53 PM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लोकांच्या मनात राग असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी नेहमी अपमानजनक बोलणाऱ्या राज्यपालांनी राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर जावं अशी खरमरीत टीकाही त्यांच्यावर त्यांनी केली.

भाजपकडून आणि त्यांच्या अनेक नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक वक्तव्य केले जाते. त्यामुळे लोकांच्या भावना दुखवल्या आहेत.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेची एकच इच्छा आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातून बाहेर जावं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकद नाही अशी चूक त्यांनी दुसऱ्यांदा केली आहे. त्यामुळे येथील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असंही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

महापुरुषांबद्दल तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल तर त्याला राज्यातून हा विरोध होणारच असंही रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

राज्यपालांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य हे एकदा नाही तर दोनदा केलं आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्र अजिबात खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रात राज्यपालांना होणारा विरोध हा एका व्यक्तीचा नाही तर तो येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राबाहेर जावं अशी इच्छा येथील जनतेची असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...