AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची नवीन कविता वाचली का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना असा काढला चिमटा

Ramdas Athawale on Raj-Uddhav : रामदास आठवले हे शीघ्रकवी म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या कविता हा जनसामान्यांचाच नाही तर राजकारण्यांना ही आवडतात. संसदेत ही त्यांच्या कवितांना चांगली दाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे. आता त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना असा चिमटा काढला आहे...

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची नवीन कविता वाचली का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना असा काढला चिमटा
रामदास आठवले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Aug 22, 2025 | 12:53 PM
Share

रिपाई नेते रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. शीघ्र कविता हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. यमक जुळवत कवितेतून चिमटे काढणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या कविता हा जनसामान्यांचाच नाही तर राजकारण्यांना ही आवडतात. संसदेत ही त्यांच्या कवितांना चांगली दाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे. त्यांच्या कवितांवर टीका होत असली तरी त्यांची कविता ऐकून त्याला मनमुराद दाद देणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता त्यांनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना राज आणि उद्धव ठाकरे यांना असा चिमटा काढला आहे.

असा काढला चिमटा

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती” अशी कविता त्यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका केली.राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमतं. राज ठाकरेंना मत पडणार नाहीत ही कळ्या दगडावरील रेघ असल्याचा चिमटा ही आठवले यांनी काढला.

आरपीआयचा स्वबळाचा नारा

महायुती म्हणून आगामी निवडणुका लढाव्या आणि आरपीआयलाही सन्मान योजना जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेत आरपीआयला 15 जागांची रामदास आठवले यांच्याकडून मागणी, योग्य वाटा मिळाला नाही तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यभरात आरपीआयची ताकद आहे. त्या ठिकाणी सन्मान जनक वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे.

मराठा आंदोलक सुद्धा भेटीला

दरम्यान मराठा आंदोलकांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आठवले यांनी भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तर मुंबई मोर्चापूर्वी मराठा आरक्षणाविषयीचा तोडगा काढावा यासाठी आठवलेंनी भूमिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर याप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांविषयी अवगत करू असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.