AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देशातील मतदारांचा EVMवर विश्वास नाही, तरीपण आम्ही…’; संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर निशाणा

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं असून निवडणुक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आयोगावरही निशाणा साधलाय.

'देशातील मतदारांचा EVMवर विश्वास नाही, तरीपण आम्ही...';  संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर निशाणा
| Updated on: Mar 16, 2024 | 6:27 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. यंदाची निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे. निवडणुक आयोगााने तारखा जाहीर करत 97 कोटी मतदार यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. अशातच यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना निवडणुक आयोगाला सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल होणार आहात का? असा सवाल करत निशाणा साधला आहे.

निवडणुक आयोग सध्याच्या सत्ताोधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे अशी शंका लोकांच्या मनात आहे. उद्याच्या निवडणुका स्वतंत्र आणि पारदर्शक करत या शंकांचं निरसन करावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढलळाढवळ, पैशांच्या उधळपट्टीवर नियंत्रण असण गरजेचं आहे. आज लोक साशंक आहेत, त्यामुळे आज तारखा जाहीर केल्या असल्या तरी आपण स्वतंत्र आहोत हे दाखवून द्यावं. पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचं दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. देशात पारदर्शक निवडणुका होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकत नाही. मोदी आणि निवडणुका एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. देशातील मतदारांचा EVM वर विश्वास नाही. तरीपण आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे निवडणुक आयोग इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुल्यासारखं वागणार आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मविआचं जागावाटप जवळजवळ संपलं आहे. मविआतील जवळपास सर्व जागा निश्चित झाल्या आहेत. वंचितने आमच्यासोबत निवडणुका लढवाव्यात, प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्त्व करावं. राजू शेट्टी यांना मविआमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न, त्यांच्यासारखा शेतकरी नेता संसदेत हवा, संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

देशात 2 लाखाहून अधिक मतदार 100 वर्षाचे आहेत. देशात 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे, अशी माहिती मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

Follow Us
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.