AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्यामध्ये सगळे आलबेल”; शिवसेनेच्या आमदाराने वादावर पडदा टाकला…

उत्साहाच्या भरात काही नेत्यांकडून वाटेल तशी वक्तव्य केली जातात, तशी वक्तव्य करणे खरं तर टाळली पाहिजे असा सल्लाही त्यांनी आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे. 

आमच्यामध्ये सगळे आलबेल; शिवसेनेच्या आमदाराने वादावर पडदा टाकला...
| Updated on: Jun 14, 2023 | 6:24 PM
Share

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सरकारच्या जाहिरातीबाजीवरून जोरदार वादळ उठले आहे. शिवसेना-भाजपसह विरोधकांनीही या जाहिरातीबाजीवरून सडकून टीका केली आहे. विरोधकांनी जाहिरातीच्या विषयावरून आता सरकारमध्ये बेबनाव असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे आता शिवसेनेतील नेत्यानी आमची युती भक्कम असून जाहिरातीवरून कोणतेह मतभेद नाहीत तर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या विचारानुसार आमचे सरकार योग्य प्रकारे काम करत असल्याचा विश्वासही आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या सरकारबद्दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यक्त करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका करताना शिवसेना आणि भाजपचा वाद विकोपाला गेला असल्याची टीका केली गेली होती. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताा संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे की, वाद हे सगळीकडेच असतात. वाद नसतात कुठे सगळ्या राजकीय पक्षामध्ये वाद होत असतात.

तो वाद मिठण्यासारखा

त्यामुळे आमच्यातील हा वाद टोकाचा नाही तर तो वाद मिठण्यासारखा असल्याचे सांगत हा वादही काही दिवसात संपून जाईल असंही संजय शिरसाठी यांनी विश्वासाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या सरकारचे काम लोकांच्या पसंदीला उतरत आहे.

सर्वसामान्य माणूस युतीबरोबर

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस शिवसेना भाजप युतीबरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे आता विरोधकांमध्ये नाराजी आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे विरोधकांच्या बत्त्या पेटल्या आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

हे आता वरिष्ठ नेते ठरवतील

तर जागा वाटपावरून चालेलेल्या राजकारणावरूनही संजय शिरसाठ यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. ही जागा कोणाला ती जागा कोणाला हे आपण ठरवणार आहात का? हे आता वरिष्ठ नेते ठरवतील अशा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

एकमेकांच्या हातात हात

त्यातच उत्साहाच्या भरात काही नेत्यांकडून वाटेल तशी वक्तव्य केली जातात, तशी वक्तव्य करणे खरं तर टाळली पाहिजे असा सल्लाही त्यांनी आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांना दिला आहे. काही वक्तव्य केली गेली असली तरी, आमच्यामध्ये सगळे आलबेल असून शिंदे आणि फडणवीस एकमेकांच्या हातात हात घालून काम करत असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले.

शिंदेंना संधी मिळाली

ज्या प्रकारे एकाद्या व्यक्तीला संधी मिळते एकाद्या पदावर काम करण्याची जशी नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनीही जगात आपले वेगळे नाव करून दाखवले. तशीच एक सामान्य कार्यकर्ता असणाऱ्या शिंदेंना संधी मिळाली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.