AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी

मनसेचा महायुतीतला प्रवेश हा कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिस्टकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ताज लँड्समधील बोलणी फिस्कटली. त्यामुळे मनसेचा महायुतीत प्रवेश होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 10, 2024 | 5:33 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावरुन मनसे उमेदवाराने  निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे महायुतीत जाण्याबाबतची बोलणी फिस्कटल्याचं त्यांनी जाहीर केलं. पण आता सूत्रांकडून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेचा महायुतीतला प्रवेश हा कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिस्टकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ताज लँड्समधील बोलणी फिस्कटली. त्यामुळे मनसेचा महायुतीत प्रवेश होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव होता. शिंदे धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी आग्रही होते. पण इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते. त्यांनी कालच्या भाषणाबाबत उल्लेख केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मनसेच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला नव्हता, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडल्या?

राज ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. राज ठाकरे यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट 19 मार्चला झाली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत मनसेला 2 जागा देण्याबाबतचा प्रस्ताव होता. मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई देण्याची चर्चा झाली. दिल्लीत झालेली बैठक सकारात्मक होती. यानंतर मुंबईत राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार, याच बैठकीत मनसेच्या महायुतीत प्रवेशाबाबतची बोलणी फिस्कटली.

बोलणी फिस्टकण्यामागे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं हा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं या भूमिकेवर आग्रही होते. तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार इंजिन सोडून दुसऱ्या चिन्हावर लढू नये यावर राज ठाकरे ठाम होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांना राज्यसभा आणि विधान परिषदेचीही ऑफर देण्यात आली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.