AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Rain | वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका

विरार : वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला होता. विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा […]

Vasai Rain | वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय, जाधव पाड्यात 80 रहिवाशांची सुटका
वसई विरार परिसरात पावसाचे पाणी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 18, 2021 | 10:34 AM
Share

विरार : वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला होता.

विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोषभूवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी हा परिसर पूर्ण जलमय झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मध्यरात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने रहिवासी झोपेत असताना काही समजण्याच्या आधीच सर्वत्र हाहाःकार माजला होता. कनेर फाटा जाधव नगर येथील बाजूचा नाला तुडुंब भरुन सर्व पाणी चाळीतील घरात शिरले होते. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. मध्यरात्री वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहचून 80 नागरिकांना बाहेर काढले आहे.

Vasai Virar Rain

वसई विरार परिसरात पावसाचे पाणी

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी दोरीच्या साहाय्याने 20 लहान मुलं, 25 महिला (यापैकी तीन गर्भवती), 30 पुरुष आणि 7 ते 8 शेळ्या बकऱ्या यांना सुखरुप बाहेर काढले. हे बचावकार्य पहाटे 5 वाजेपर्यंत चालले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही

दरम्यान, वसई ते वसई फाटा कडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. वसई मुख्य रस्त्यावर गुडघाभार पाणी साचल्याने, अनेक वाहनं बंद पडली. वसई मिठागराला पूर्णपणे पाण्याचा वेडा पडला आहे. वसई फाट्याकडे जाणारा रस्ता, एव्हरशाईन सिग्नल, वसंत नागरी सिग्नल, सर्व पाण्याखाली गेले होते.

संबंधित बातम्या :

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

(Vasai Virar Rain Update Jadhav Vasti Flood Water Mumbai Rains)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...