AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार’, मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा दावा

"मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे. पाटील यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. पाटील यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहे", असं मोठं वक्तव्य मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी केलं.

'मनोज जरांगे यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार', मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा दावा
मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा दावा
| Updated on: Oct 31, 2024 | 3:21 PM
Share

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जायचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील आणि दोन्ही धर्माच्या धर्मगुरुंनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला? या विषयी सविस्तर माहिती दिली. मनोज जरांगे पाटील येत्या 3 नोव्हेंबरला उमेदवारांची घोषणा करणार आहेत. आपण सांगू त्या उमेदवाराला निवडून आणायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावेळी मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मोठा दावा केला. “मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे”, असं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.

“जरांगे मला मराठी शिकवतील. पण ते मला मराठी शिकवतील. केवळ हिंदी बोलता येत नसल्याने जरांगे हरियाणात गेले नाही. त्यांना तिकडून बोलणं आलं होतं. त्यांना इतर ठिकाणीही बोलावलं होतं. मी आता त्यांच्यासोबत देशभर जाईल. त्यांचं मराठी भाषण हिंदीत अनुवादीत करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रुपात भारताला एक गांधी मिळणार आहे. पाटील यांच्या रुपात भारताला नवे बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहेत. पाटील यांच्या रुपात नवे मौलाना आझाद मिळणार आहे”, असं मोठं वक्तव्य सज्जाद नोमानी यांनी केलं.

‘देशात फूट पाडणाऱ्या ताकद’

“देश कठीण परिस्थितीतून जात आहे. अनेक आव्हाने आहेत. देशातील लोक विभाजीत झाले तर विदेशी ताकदीचा मुकाबला करता येणार नाही. देशात फूट पाडणाऱ्या ताकद आहेत. त्या सत्तेत आहेत. त्या विदेशी शक्तीच्या एजंट आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर देशाला विभाजित केलं जात आहे. फोडा आणि राज्य कराचा जुनाच फॉर्म्युला वापरला जात आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिक राजधानी इथेच आहे. पण राज्यातील भांडवल गुजरातला नेलं जात आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे. राज्याचा इतिहास प्रेम आणि सद्भावनेचा आहे. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे इनचार्ज इब्राहीम खान होते”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.

“भाजप आणि संघाने धर्माच्या नावावर वाद निर्माण केले. सर्व धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी देशवासियांमध्ये फाळणी केली. गेल्या ४० वर्षापासून मी संपूर्ण देशात गरीब, मुस्लिम, एससी एसटी, महिला, शेतकरी या सर्वांना मी एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जातं’

“सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहे. अदानी आणि अंबानींना सर्व दिलं जात आहे. शेतकरी उपाशी मरत आहे. देशातील ज्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी कधी मंदिर, कधी मशीद तर कधी ख्रिश्चनांचा विषय काढला जात आहे. आज एक दलित व्यक्ती घोड्यावर बसून त्याची वरात काढू शकत नाही ही देशाची परिस्थिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वधर्म समभाव आणि समतेचा विचार मांडला. संविधानात बंधुत्व दिलं आहे. मी कायदाचा विद्यार्थी होतो. मी अमेरिका आणि इतर देशाचे संविधान वाचले आहे. सर्व देशात मी फिरलो आहे. पण भारतासारखं संविधान मी कुठे पाहिलं नाही”, असं सज्जाद नोमानी म्हणाले.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.