AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत.

ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा
ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2022 | 9:19 AM
Share

नागपूर: तुमच्या नाकाखालून खेचून सरकार नेलं, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचाच हात होता. हे त्रिवार सत्य आहे, असा दावाच अजित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी सरकार पाडण्यात भाजपचा हात कसा होता याचे उदाहरणेच सांगितली.

सरकार पाडण्यात आमचा काही संबंध नाही. आम्ही नामानिराळे आहोत, असं भाजपकडून सुरुवातीला सांगितलं जात होतं. नंतर 15 -16 आमदार निघून गेले. आता अलिकडे भाजपमधील काही लोकांची वक्तव्ये आली आहेत. मीच आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केले होते, असं काही जण म्हणाले.

तर काहींच्या कुटुंबातील लोकांनी ते वेषभूषा करून कसे जायचे हे सांगितलं. फोन करून मी पाठवलं, वेशभूषा बदलून जात होते, बदला घेतला हे कोणी म्हटलं? हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ सुरुवातीपासूनच ते सरकार पाडण्याच्या तयारीत होते. हे त्रिवार सत्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्यांच्या हाताला एकनाथराव शिंदे लागले. एक गट लागला. त्यामुळे त्यांना सरकार बदलवता आलं. पण 15-16 आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण कोर्टात आहे. त्याच्या तारखावर तारखा पडत आहेत. तो निकाल लागल्यावर काय ते चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा सगळा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मंत्रिमंडळ किती संख्येचं असावं नसावं हा त्यांचा विषय आहे. फक्त जनतेची कामे झाली पाहिजे. आम्हाला मंत्रिमंडळात स्वारस्य नाही, असं अजितदादांनी सांगितलं.

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत. हे चित्रं महाराष्ट्राला शोभनीय नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. त्यावर काही ठोस घडत नाही.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. काही लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. काही लाख नोकऱ्या मिळणार होत्या. ही गुंतवणूक का झाली नाही? याचं उत्तर मिळत नाही. सीमावादाचा प्रश्न कधीच एवढा चिघळला नव्हता. आताच का चिघळला? याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मी सुरुवातीपासून नागपूरमध्ये होताना तीन आठवड्याचं करण्यात आलं. दोन वर्ष कोरोनामुळे अधिवेशन झालं नाही. कारण नसताना गैरसमज होतात. इथल्या लोकांना मुद्दाम अधिवेशन घेत नाही. कारण नसताना चुकीची भावना त्यांच्या मनात येते.

काल मी पत्रकार परिषद घेतली. त्यातही तोच आग्रह धरला होता. अधिवेशन जास्त काळ चाललं तर अनेक प्रश्न चर्चेला येतात. राज्य सरकारची भूमिका कळते. त्यातून उत्तरे देतात. राज्यकर्ते उत्तरांना बांधिल असते.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.