ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत.

ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा
ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 9:19 AM

नागपूर: तुमच्या नाकाखालून खेचून सरकार नेलं, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचाच हात होता. हे त्रिवार सत्य आहे, असा दावाच अजित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी सरकार पाडण्यात भाजपचा हात कसा होता याचे उदाहरणेच सांगितली.

सरकार पाडण्यात आमचा काही संबंध नाही. आम्ही नामानिराळे आहोत, असं भाजपकडून सुरुवातीला सांगितलं जात होतं. नंतर 15 -16 आमदार निघून गेले. आता अलिकडे भाजपमधील काही लोकांची वक्तव्ये आली आहेत. मीच आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केले होते, असं काही जण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर काहींच्या कुटुंबातील लोकांनी ते वेषभूषा करून कसे जायचे हे सांगितलं. फोन करून मी पाठवलं, वेशभूषा बदलून जात होते, बदला घेतला हे कोणी म्हटलं? हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ सुरुवातीपासूनच ते सरकार पाडण्याच्या तयारीत होते. हे त्रिवार सत्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्यांच्या हाताला एकनाथराव शिंदे लागले. एक गट लागला. त्यामुळे त्यांना सरकार बदलवता आलं. पण 15-16 आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण कोर्टात आहे. त्याच्या तारखावर तारखा पडत आहेत. तो निकाल लागल्यावर काय ते चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा सगळा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मंत्रिमंडळ किती संख्येचं असावं नसावं हा त्यांचा विषय आहे. फक्त जनतेची कामे झाली पाहिजे. आम्हाला मंत्रिमंडळात स्वारस्य नाही, असं अजितदादांनी सांगितलं.

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत. हे चित्रं महाराष्ट्राला शोभनीय नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. त्यावर काही ठोस घडत नाही.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. काही लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. काही लाख नोकऱ्या मिळणार होत्या. ही गुंतवणूक का झाली नाही? याचं उत्तर मिळत नाही. सीमावादाचा प्रश्न कधीच एवढा चिघळला नव्हता. आताच का चिघळला? याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मी सुरुवातीपासून नागपूरमध्ये होताना तीन आठवड्याचं करण्यात आलं. दोन वर्ष कोरोनामुळे अधिवेशन झालं नाही. कारण नसताना गैरसमज होतात. इथल्या लोकांना मुद्दाम अधिवेशन घेत नाही. कारण नसताना चुकीची भावना त्यांच्या मनात येते.

काल मी पत्रकार परिषद घेतली. त्यातही तोच आग्रह धरला होता. अधिवेशन जास्त काळ चाललं तर अनेक प्रश्न चर्चेला येतात. राज्य सरकारची भूमिका कळते. त्यातून उत्तरे देतात. राज्यकर्ते उत्तरांना बांधिल असते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.