AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : मग होऊ द्या दूध का दूध नि पानी…, मत चोरीप्रकरणात शरद पवार मैदानात, म्हणाले काय?

Sharad Pawar on Election Commission : कालपासून राहुल गांधी हे देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी मत चोरल्याचा बॉम्ब टाकून केंद्रीय निवडणूक आयोगच नाही तर सत्ताधाऱ्यांना झटका दिला आहे. आता त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत.

Sharad Pawar : मग होऊ द्या दूध का दूध नि पानी..., मत चोरीप्रकरणात शरद पवार मैदानात, म्हणाले काय?
शरद पवार, राहुल गांधी, निवडणूक आयोग
| Updated on: Aug 09, 2025 | 11:43 AM
Share

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. मत चोरीच्या त्यांच्या बॉम्बवर त्वरीत प्रतिक्रिया आली. सत्ताधारीच नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाने भराभर मतांची बिदागी टाकली. पण मत चोरीवर राहुल गांधींचे मुद्दे खोडण्यात आले का? तर हा प्रश्न अजून उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसते. आता मत चोरीच्या प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारले आहेत.

राहुल गांधींच्या आरोपाने देशभरात खळबळ

राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतांची चोरी केली. मतांची हेराफेरी केल्याचा खळबळजनक दावा केला. आरोपांवर न थांबता त्यांनी थेट पुरावे दिले. कर्नाटक, महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी मतदार याद्यातील घोळावर प्रकाश टाकला. एकाच ठिकाणचा पत्ता टाकून किती बोगस मतदार वाढवले याची जंत्रीच त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

विशेष म्हणजे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लागलीच त्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. भाजपच्या आमदार,खासदार, मंत्र्यांनी त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचा आरोप म्हणजे नवीन बाटलीत जुनी दारू अशी टीका केली आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले.

शरद पवारांनी ठोकले शड्डू

ज्येष्ठ नेते शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी राहुल गांधी यांनी मांडलेल्या मत चोरीच्या मुद्दाला समर्थन दिले. निवडणूक आयोगाला जर त्याच्यावर आक्षेप असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर दूध का दूध आणि पानी का पानी करावे असे आवाहन शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे आता विरोधक मत चोरी प्रकरणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक आयोगांवर लावलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या आरोपांवर संशय घेण्यास वाव आहे. आयोगावर लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे असे शरद पवार म्हणाले. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. त्यांनी राहुल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले. तर निवडणूक आयोगावर आरोप झाले आहेत. राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे आहे, भाजपाकडून नको, असा टोलाही पवारांनी यावेळी हाणला.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच