AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची मैत्री कायम… दादा भुसेंसमोरच संजय राऊत यांचं भुवया उंचावणारं विधान; पडद्यामागे काही घडणार?

Dada Bhuse And Sanjay Raut: 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी मालेगाव कोर्टात आज खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे हे हजर झाले. दोघांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांना भुसेंसोबतची मैत्री कायम असल्याचे मोठे वक्तव्य केले.

आमची मैत्री कायम... दादा भुसेंसमोरच संजय राऊत यांचं भुवया उंचावणारं विधान; पडद्यामागे काही घडणार?
दादा भुसे, संजय राऊत मैत्री कायमImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 12:29 PM
Share

Dada Bhuse And Sanjay Raut: खासदार संजय राऊतांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बदनामी केल्याचे सांगत फौजदारी खटला भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणाीसाठी आज संजय राऊत आणि भुसे मालेगाव कोर्टात हजर झाले. यावेळी दादा भुसे यांनी राऊतांवरील दाखल खटला मागे घेतल्याचा दावा केला. तर आमची मैत्री कायम असल्याचे वक्तव्य करून राऊतांनी अनेकांच्या विकेट काढल्या. त्यामुळे पडद्यामागे काही घडणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

आमचे मैत्रीचे संबंध कायम

हा खटला मागे घेतल्यानंतर दोन्ही नेते एकत्रच माध्यमांसमोर आले. त्यावेळी संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यांसोबतची मैत्रीचे संबंध कायम राहतील अशी ग्वाही दिली. कोर्टात खटला चालू होता. दादा भुसे आणि आमच्यात तोडगा निघाला आहे. मी जे विधान केलं होतं. ते चुकीचं होतं, असे राऊत म्हणाले. हे नंतर माझ्या पडताळणीनंतर लक्षात आलं. त्यामुळे मी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता. अद्वैत हिरे यांनी जी माहिती दिली त्यामुळे आम्ही त्यात गुंतलो.आता आम्ही खटला मागे घेतला. अद्वैत हिरे सत्तेत आहेत. त्यांना लढायचं तर ते लढू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले. आता वादाचा विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. दादा भुसे आणि माझे मैत्रीचे संबंध कायम आहेत. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपवला आहे. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून संपवला असे दादा भुसे यावेळी म्हणाले.

दादा भुसे म्हणाले काय?

यावेळी माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले की, राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. त्यामुळे खटला मागे घेऊ. त्यांचा मान राखू असं शेतकर्‍यांनी सांगितलं आहे. आम्ही राऊत यांच्या हाताखाली काम केलं आहे. दादा भुसे काय करतो आणि काय करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यांनी खातरजमा केली नाही. पण नंतर माहिती घेतल्यावर त्यांनी चूक दुरूस्त केली.

Follow Us
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.