AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक
| Edited By: | Updated on: Mar 08, 2023 | 6:41 PM
Share

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लहान मुलांना जोपासतो त्या तुलनेत जपून वाढविलेल्या पिकाला बाजारेठांमध्ये विरक्रिसाठी गेल्यावर लागणार खर्च देखील निघत नसल्याने सरकारने त्याकडे लक्ष घालण्याची मागणी मालेगावातील शेतकरी करीत आहेत.

आधीच अर्थ चक्रात सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी दुर्दैवाने हातबल झालेला असतानाच अस्मानी संकटानेदेखील डोळे वटारले आहेत.

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसानेगी फटका दिला आहे.

कांदा लागवडी पासून ते निघेपर्यंतचा लागणारा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जवळपास गेल्या तीन ते चार वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून उत्पादन खर्च देखील निघत नसलेल्या शेतीच्याच अर्थचक्रात अडकून पडला आहे. आता आहे त्या भावात कांदा विकावा लागणार असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी सरकारने तरी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये तरी शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....