AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

निसर्गाने पाठ फिरवली, मायबाप सरकार आता तुम्ही तरी..; बळीराजाची सरकारला आर्त हाक
| Edited By: | Updated on: Mar 08, 2023 | 6:41 PM
Share

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. लहान मुलांना जोपासतो त्या तुलनेत जपून वाढविलेल्या पिकाला बाजारेठांमध्ये विरक्रिसाठी गेल्यावर लागणार खर्च देखील निघत नसल्याने सरकारने त्याकडे लक्ष घालण्याची मागणी मालेगावातील शेतकरी करीत आहेत.

आधीच अर्थ चक्रात सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी दुर्दैवाने हातबल झालेला असतानाच अस्मानी संकटानेदेखील डोळे वटारले आहेत.

कष्टाने पिकवलेल्या कांद्याला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसानेगी फटका दिला आहे.

कांदा लागवडी पासून ते निघेपर्यंतचा लागणारा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जवळपास गेल्या तीन ते चार वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून उत्पादन खर्च देखील निघत नसलेल्या शेतीच्याच अर्थचक्रात अडकून पडला आहे. आता आहे त्या भावात कांदा विकावा लागणार असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी सरकारने तरी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये तरी शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आता शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

कधी गडगडणारा बाजारभाव तर कधी  अवकाळी पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने कोसळणाऱ्या बाजारभावामुळे शेतात आलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.