AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून […]

नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी
धरणाचे पाणी कांदा शेतीत सोडल्याने शेतीचे नुकसान
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 8:54 AM
Share

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून या धरणातून पाणी सोडले नसल्याचे समजते.

धरणातील पाणी वाया

पाणी सोडण्याच्या गेटच्या गळतीच्या थोडेफार पाण्याचा वापर करून शेतकरी शेती पिकवतात, त्यामुळे धरणातील पाणी कमी झाले आहे. धरणात सध्या थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अज्ञातांनी धरणाचे पाणी सोडले

शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडे केल्याने रात्रभर पाणी धरणाखालील शेतात शिरले. यामध्ये भांडणे येथील शेतकरी सखाराम भोरू गायकवाड, शंकर कुवर व चंद्रकांत कुवर यांच्या कांदा पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादक अडचणीत

शेतकऱ्यांवर आधीचे मोठे संकट असल्याने दुसरे हे पाण्याचे संकट उभा राहिले आहे. कांद्याचा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने आमच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांदा पाण्यामुळे वाया जाणार

कळवण तालुक्यातील मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा दरवाजा रात्रीच्यावेळी ज्या अज्ञात व्यक्तीने उघडला आहे. त्याचा शोध घेण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतातील कांदा पाण्यामुळे वाया जाणार असल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.