AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून […]

नाशकातल्या कळवणमध्ये धरणाचे पाणी शेतात गेल्याने काढणी केलेल्या कांदा पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी
धरणाचे पाणी कांदा शेतीत सोडल्याने शेतीचे नुकसान
| Edited By: | Updated on: May 24, 2022 | 8:54 AM
Share

नाशिकः नाशिकमधील कळवण तालुक्यातील (Taluka Kalwan) मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा (Dam Water) दरवाजा रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीने उघडून दिल्याने शेतीसह पिकांचे नुकसान (Damage to crops including agriculture) होऊन ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाण्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिव भांडणे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पाचा सांडावा तसेच पाटचारीची दुरूस्ती न केल्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांपासून या धरणातून पाणी सोडले नसल्याचे समजते.

धरणातील पाणी वाया

पाणी सोडण्याच्या गेटच्या गळतीच्या थोडेफार पाण्याचा वापर करून शेतकरी शेती पिकवतात, त्यामुळे धरणातील पाणी कमी झाले आहे. धरणात सध्या थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अज्ञातांनी धरणाचे पाणी सोडले

शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडे केल्याने रात्रभर पाणी धरणाखालील शेतात शिरले. यामध्ये भांडणे येथील शेतकरी सखाराम भोरू गायकवाड, शंकर कुवर व चंद्रकांत कुवर यांच्या कांदा पिकासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादक अडचणीत

शेतकऱ्यांवर आधीचे मोठे संकट असल्याने दुसरे हे पाण्याचे संकट उभा राहिले आहे. कांद्याचा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने आमच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांदा पाण्यामुळे वाया जाणार

कळवण तालुक्यातील मौजे शिवभांडणे शिवारातील धरणाच्या मोरीचा दरवाजा रात्रीच्यावेळी ज्या अज्ञात व्यक्तीने उघडला आहे. त्याचा शोध घेण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतातील कांदा पाण्यामुळे वाया जाणार असल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.