AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच; ‘ती’ महत्वपूर्ण भेट नाहीच

Ajit Pawar Sunil Tatkare Went to Mumbai : दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच आली आहे. अजित पवार अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. पण 'ती' महत्वपूर्ण भेट झालेलीच नाही. त्यामुळे अजित पवार आता मुंबईसाठी रवाना झाले आहेत. वाचा सविस्तर...

दोन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही अजित पवारांची पदरी निराशाच; 'ती' महत्वपूर्ण भेट नाहीच
अजित पवार, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: ANI
| Updated on: Dec 04, 2024 | 11:12 AM
Share

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. असं असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तब्बल दोन दिवस राजधानी दिल्लीत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी अजित पवार दिल्ली गेले होते. दोन दिवस दिल्लीत मुक्काम केल्यानंतरही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे अखेर अजित पवारांना परत मुंबईकडे फिरावं लागलं आहे. दोन दिवस तळ ठोकून दिल्लीत थांबूनही अजित पवारांना अमित शाह यांच्या सोबतच्या भेटीसाठीचा वेळ मिळालेला नाही.

अजित पवार मुंबईकडे रवाना

दोन दिवस थांबूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट नाही. आज सकाळी अजित पवार पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून अजित पवार यांचा दिल्लीत तळ होता. जादा मंत्रिपदांसाठी आणि इतर चर्चा करण्यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटणार होते. शपथविधी तोंडावर असतानाच शाह यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.

अजित पवार दिल्लीत का होते?

अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. अधिकची मंत्रिपदं आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी आणि अपेक्षित खाती आपल्याकडे घेण्यासाठी अजित पवारांना अमित शाह यांना भेटणार होते. त्यासाठी ते दोन दिवस दिल्लीत होते. पण अमित शाह यांची भेट झाली नाही. शिवाय आज दुपारी महायुतीचे तीन पक्ष सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक होणार आहे. त्यासाठी अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

आज सत्तास्थापनेचा दावा, उद्या शपथविधी

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपची आज गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडत आहे. तर आज दुपारी महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाणार आहेत. तर उद्या संध्याकाळी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.