AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुबंईत कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं काळजी घ्या, महापालिकेचं नागरिकांना आवाहन

महापालिकेच्या नियोजनबद्ध उपाययोजनेने परिस्थिती लवकर आटोक्यात आणून अदयाप नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल होण्यास मदत झाली आहे.

नवी मुबंईत कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं काळजी घ्या, महापालिकेचं नागरिकांना आवाहन
पनवेल महानगर पालिकेची ऑनलाईन सभा उशिराने सुरु, शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे आक्रमक
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 06, 2021 | 5:07 PM
Share

नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. शहरात प्रतिदिन सरासरी 50 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील बराचसा ताण हलका झाला आहे. शिवाय शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहराला चांगलाच फटका बसला होता. मात्र, महापालिकेच्या नियोजनबद्ध उपाययोजनेने परिस्थिती लवकर आटोक्यात आणून अदयाप नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल होण्यास मदत झाली आहे. नागरिकांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात ठेवल्यास तिसऱ्या लाटेला रोखण्यास पालिका प्रशासनाला अधिक सोपं जाणार आहे. (Relaxation in corona restrictions in Navi Mumbai)

सध्या पालिकेची लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांना सुरक्षित करण्यात येत आहे. मात्र, राज्य शासनाकडून लस पुरवठा कमी होत असल्याने महापालिका हतबल झाली आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यास पालिका सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर करत आहेत. या पूर्वी दोन्ही लाटेत पालिकेने परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याने आता तिसऱ्या लाटेचा तडाखा शहराला बसणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने शहरातील करोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पुढील काळात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

बसची संख्या वाढवण्याचा निर्णय

करोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आपल्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी सराकारी कार्यालयात 50 टक्केच उपस्थितीसाठी परवानगी होती. मात्र, निर्बंध शिथिल झाल्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीत सुरु झाली आहेत. शहरातील बाजारपेठा दहापर्यंत सुरू राहणार आहेत. लोकल प्रवासासाठी परवानगी नसल्याने बसमध्ये गर्दी होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात रुग्णसंख्येचा आकडा पुढील परस्थिती ठरवणार आहे.

संबंधित बातम्या :

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार

नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त

Relaxation in corona restrictions in Navi Mumbai

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक