महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या गोडाउनवर टाकला छापा; 500 किलो मुद्देमाल जप्त
सध्या अनेक ठिकाणी प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही, काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी प्लॅस्टिकबंदी (Plastic ban) लागू झाली आहे. या बंदीची नवी मुंबईतदेखील काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी व नागरिकांनी दंडात्मक कारवाईला न घाबरता स्वतःहून त्यांच्याकडील प्लास्टिक पालिका (Corporation) अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावे असे आव्हान वेळोवेळी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. याबाबतचे आदेशदेखील आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत. मात्र घणसोली विभाग अधिकारी महेंद्र सिंह ठोके यांच्या नेतृत्वाखाली घणसोली विभाग कार्यक्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांच्या गोडाउनवर छापा (raid) टाकण्यात आला आहे. यावेळी जवळपास 400 ते 500 किलो मुद्देमाल जब्त करण्यात आला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा साठा करून विक्री करणाऱ्या बी. आर. चौधरी या व्यावसायिकाकडून यावेळी 5 हजार रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टीक वापरावर बंदी
सध्या अनेक ठिकाणी प्लास्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टीक वापरावर बंदी असतानाही, काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विल्हेवाटसाठी डम्पिंग ग्राउंड
सदर पिशव्या विल्हेवाटसाठी डम्पिंग ग्राउंडला पाठविली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास केला जात असून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Bhandara Crime | भंडाऱ्यात शेतमजुराची आत्महत्या; शेतातील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास
आई होऊ न शकल्यानं महिला डॉक्टरची आत्महत्या! स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून घेत जीव दिला