पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरे यांचा दुर्घटनाग्रस्तांना दिलासा आणि ग्वाही

मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही.

पुनर्वसन होईपर्यंत तुमच्यासोबत राहू; उद्धव ठाकरे यांचा दुर्घटनाग्रस्तांना दिलासा आणि ग्वाही
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 12:39 PM

खालापूर | 22 जुलै 2023 : मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे आज पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते. दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. पण राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. त्या डोंगर उतरावर किंवा डोंगराच्या खाली आहेत. तिथे कधीही दरडी कोसळू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नीट काळजी घ्या

मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याआधी पुनर्वसन झालं असतं तर चांगलं झालं असतं. केवळ घर देणं म्हणजे पुनर्वसन होणं नाही. त्यांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल हे पाहा. कंटनेरमध्ये जास्तीत जास्त दिवस राहणार नाही याची काळजी घ्या. यात मी राजकारण आणत नाही. दु:ख मोठं आहे. सावरावं लागेलच. आम्ही तुमच्यासोबत राहू. नीट काळजी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कुणावरही वेळ येता कामा नये

तुम्ही एकत्र संवाद ठेवा. तुमची टीम तयार करा. तुम्ही धक्क्यातून सावरल्यावर काय करायचं ते सांगा. कुटुंब म्हणून मी सोबत आहे. हात जोडून विनंती करतो. जागा निवडताना धोका होणार नाही अशीच जागा सांगा. बऱ्याच वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. टप्प्याटप्प्याने करू. तुमचंही कसं पुनर्वसन करायचं हे आपण ठरवू. तुमचा परत जीव जाता कामा नये. मी सरकारशी बोलणार आहे. सरकार येत असतं आणि जात असतं. पण आपण सर्वांचं पुनर्वसन करू. कुणावरही परत ही वेळ येऊ देता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.

जेवणा खाण्याची सोय आहे का?

यावेळी त्यांनी स्थानिकांना तुमच्या जेवणा खाण्याची सोय झाली आहे का? राहण्याची व्यवस्था आहे का? प्यायला पाणी मिळते का? अशी आपुलकीने विचारपूस केली. आपल्याला परत परत हा धोका पत्करायचा नाही. आता परत जीव जाऊ द्यायचा नाही. शेळ्या मेंढ्या गेल्या हे दुर्देव आहे. तुम्ही एकत्र व्हा. पूर आणि दरडीचा धोका होणार नाही अशी जागा सांगा. तिथे तुमचं पुनर्वसन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तहसीलदारांना सूचना

यावेळी त्यांच्याकडे गावातील लोकांनी समस्या नोंदवल्या. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह कसे सापडले? घटना कशी घडली? कमावती मुलं कशी गेली? याची माहिती या लोकांनी उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही तहसीलदारांशी संवाद साधून त्यांना सूचना केल्या. येथील चार वाड्या धोक्याच्या आहेत. त्या सर्व एकत्र करा. त्यांचं एकत्रित आणि चांगल्या जागी पुनर्वसन करा. स्थानिकांना विश्वासातच घेऊन पुनर्वसन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.