AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो… सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आज मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यातून केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो... सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारलं
| Updated on: Aug 16, 2024 | 3:42 PM
Share

महाविकास आघाडीने आजपासून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून हे बिगूल फुंकण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज तडाखेबंद भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात घालतानाच सरकारला चांगलंच फटकारलंय. विशेष करून राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणींची आठवण झाली नाही. पण निवडणुकीत पराभव होताच त्यांना बहिणींची आठवण झाली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजना आणली. हे सरकार म्हणतंय एक बहीण गेली तर काय झालं? दुसरी बहीण येईल. मला या भावांना सांगायचं, हे नातं 1500 रुपयाला विकाऊ नाही हो, असं सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दात सरकारला टोला लगावला. पण सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात चर्र झालं.

हा नात्याचा अपमान

आमच्या नात्याचा हा अपमान आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा अपमान आहे. मुळातच बहीण आणि भावाचं प्रेम असतं. त्याला किंमत लावली जात नाही. पण या सरकारने त्याला किंमत लावण्याचं पाप केलं आहे, असा जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. या सरकारने केवळ मतांसाठी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली आहे. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतो तर व्यवसायात प्रेम नसतं. व्यवसायात प्रेम आलं तर नातं अंगावर येतं आणि नात्यात व्यवसाय आला तर तिथे प्रेम राहत नाही, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी लगावला.

पैसे परत घेऊन दाखवाच

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर काढून घेणार असल्याचं विधान सत्ताधारी आमदार करत आहेत. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये लाडकी बहीण योजनेचे 10 हजार रुपये काढून घेतले जाणार आहेत. ज्या महिलांनी मतदान केलं नाही, त्यांचे पैसे परत घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही पैसे काढून तर दाखवाच… असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी केला.

90 दिवस कष्टाची परिकाष्ठा करा

यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट वाटप करण्याचं साकडं घातलं. कुणालाही तिकीट द्या. पण लवकरात लवकर जागा वाटप करा, कारण आपल्याला देशाचं आणि राज्याचं वातावरण बदलायचं आहे, असं त्या म्हणाल्या. गेली अडीच वर्ष खेळीमेळीच्या वातावरणात आपण काम केलं. आपल्याला अजूनही पुढची पाच वर्ष काम करायचे आहे. फक्त 90 दिवस सर्व काही बाजूला ठेवा आणि एकत्र या. या 90 दिवसात कष्टांची परिकष्टा करून दिल्लीसमोर न झुकणारं सरकार आणण्याची जबाबदारी आपली आहे, असंही त्या म्हणाल्या.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.