AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावकरांना विरोध अमान्यच… देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात संपवला विषय

Devendra Fadnavis : वीर सावरकरांच्या विचारांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत मतभेद निर्माण झाले आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.

सावकरांना विरोध अमान्यच... देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात संपवला विषय
CM Fadnavis Image Credit source: Google
| Updated on: Jan 06, 2026 | 6:54 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीत मदभेद होत असल्याचे समोर आलेले आहे. 70 हजार कोटींचा आरोप होऊन मी आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचे वक्तव्य अजितदादांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांना यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे आम्ही आणि आमचा पक्ष आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याविना, विरोधात शिरला तर विरोधात, आम्ही आमचं काम करत राहू असा इशारा दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी, ‘कुणीही जबरदस्तीने विचार लादू शकत नाही, कारण भारत देश संविधानावर चालतो असं म्हटलं आहे. यानंतर आता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही नेत्यांनी यावर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे सावरकरांच्या मुद्द्यावर भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘वीर सावरकरांच्या विचारांचा अजित दादांनी विरोध करण्याचं कारण नाही. त्यांनी विरोध केल्याचं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. पण आमची भूमिका ही पक्की आहे की, वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली, यावर बोलताना अजित पवारांना सावध भूमिका घेत थेट टीका करणे टाळले आहे. अजित पवार म्हणाले की, ‘तुम्ही मला विकासाबद्दल विचारा आमच्या महायुतीत अंतर कसे वाढेल, यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. मला फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारावेत. मी ज्या महापालिकेत प्रचारासाठी जाईल, त्याच महापालिकेसंदर्भात मला प्रश्न विचाराला हवेत. इतर प्रश्न विचारले तर मी त्याचे उत्तर देणार नाही. तसेच निवडणुका संपल्यावर मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात अजित पवार या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक
Sunil Tatkare | लेकासाठी तटकरेंची खटाटोप? थेट शिंदेंची घेतली भेट, नेमक.
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.