AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले.

Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 20, 2022 | 11:02 AM
Share

भंडारदरा : भंडारदरा (Bhandardara) पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. 3500 क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. हे पाणी प्रवरा नदीत (Pravara River) सोडण्यात आले आहे. यामुळे अत्यंत मनमोहक असा नजारा पहायला मिळतोयं. धरणातील पाणीसाठा 85 टक्के झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग अजून वाढविण्याची होण्याची शक्यता देखील आहे. भंडारदरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावलीयं.

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले. हे पाणी खाली निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवडे 80 टक्के भरले आहे. एकंदरीतच काय तर चांगल्या पावसामुळे यंदा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसते आहे.

भंडारदरा धरण 85.84 टक्के भरले

जिल्हात आतापर्यंत भंडारदरा 62, 2176 मिमी, घाटघर 86, 3002 मिमी, रतनवाडी 82, 3113 मिमी, पांजरे – N.R 655 मिमी, वाकी 49, 1703 मिमी, निळवंडे 06, 801 मिमी, आधला 216 मिमी, अकोले 03, 394 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीयं. तर अहमदनगर जिल्हयातील तीन महत्वाच्या धरणातील सध्याची पाणीपातळी भंडारदरा 85.84 टक्के, निळवंडे 81.67 टक्के, मुळा धरण 65 टक्के आहेत. म्हणजेच काय तर अहमदनगर जिल्हयातील महत्वाची तीनही धरणे चांगल्या स्थितीमध्ये असल्याने अहमदनगरकरांना नो टेन्शन आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.