AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा नसल्याने मुलींकडूनच पार्थिवाला खांदा, 5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप

अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच लेकींनी साश्रू नयनांनी खांदा दिला. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला.

मुलगा नसल्याने मुलींकडूनच पार्थिवाला खांदा, 5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप
पाच लेकींनी आईवर अंतिम संस्कार केले...
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 12:54 PM
Share

गडचिरोली : अंत्यसंस्कारावेळी पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या आईला पाच लेकींनी साश्रू नयनांनी खांदा दिला. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग शेकडो गावकऱ्यांनी अनुभवला. मुलगा नसल्यामुळे पाच मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंतिम संस्कार केले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या पाच लेकींनी भासू दिली नाही.

5 मुलींकडून आईला अखेरचा निरोप

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथील रहिवासी अण्णाजी रामचंद्र पाकलवार यांच्या पत्नी निर्मला पाकलवार यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पाकलवार यांना 5 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.

आई वडिलांच्या पार्थिवावर मुलांनी अंतिम संस्कार करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आई वडिलांच्या निधनानंतर मुलांच्या हातांनी अंतिम संस्कार पार पाडण्याची प्रथा आहे. परंतु पाकलवार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या मुलींनीच अंतिम संस्कार पार पाडले.

शिक्षणाचा वसा देणारे रामचंद्र गुरुजी

कोरचीचे अण्णाजी रामचंद्र पाकलवार हे माजी मुख्याध्यापक असून त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पडगा आहे. मुलगा नसल्याची खंत त्यांना आयुष्यभर कधीही वाटली नाही. पत्नी गेल्यानंतरही आपल्या मुलींनी अंत्यसंस्कार करावे, या मताचे ते होते. त्यानुसार पाकलवारांच्या 5 मुलींनी आपल्या लाडक्या आईला साश्रू नयनांनी निरोप दिला.

पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा

पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.

बीडमध्ये चार सुनांचा सासूला खांदा

बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला होता.

(Five Daughters perform last rites of mother in maharashtra Gadchiroli)

हे ही वाचा :

आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला

बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या पित्याला लेकींचा अखेरचा निरोप

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.