AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. कणकेश्वरमध्ये जन आशीर्वाद आल्यानंतर राणेंचं मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आलं. (narayan rane)

नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण
narayan rane
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 2:53 PM
Share

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. कणकेश्वरमध्ये जन आशीर्वाद आल्यानंतर राणेंचं मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आलं. राणेंना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून यावेळी प्रार्थना करण्यात आली. (Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातील कणकेश्वरमध्ये आली. यावेळी मंडपात कणकेश्वराच्या साक्षीने पुरोहितांनी मंत्रपठण करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी राणे कुटुंबासहित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार, प्रमोद जठार आणि रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या औक्षण कार्यक्रमानंतर राणेंची पुन्हा यात्रा सुरू झाली.

राणेंचं मनस्वास्थ बिघडलं: राऊत

नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं.

राणेचं आरोग्य उत्तम

राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. उलट आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडेल, असं सांगतानाच आम्ही लवकरचं दोन राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिला आहे.

देवगडमध्ये पोलीस बंदोबस्त

देवगड शिवसेना शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी काही शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन उभे आहेत. साधारण 30 ते 40 शिवसैनिक उपस्थित आहे. जामसंडेची सभा झाल्यानंतर याच मार्गावरून नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा जाणार आहे.

जामसंडे यात्रेत राणे काय म्हणाले?

दरम्यान, जामसंडे इथे नारायण राणेंनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “मोदी यांनी मला केंद्रीय मंत्री बनविले, भारताला मोदी प्रगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींबदल गर्व आणि अभिमान वाटतो” (Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

संबंधित बातम्या:

नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

(Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.