AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काल ठाकरे बंधूंचा मेळावा अन् आज शिवसेनेच्या बड्या नेत्याचं थेट शिंदेंना पत्र, घडामोडींना वेग

सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यानं एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे.

मोठी बातमी! काल ठाकरे बंधूंचा मेळावा अन् आज शिवसेनेच्या बड्या नेत्याचं थेट शिंदेंना पत्र, घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2025 | 3:02 PM
Share

सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं सरनाईक यांनी? 

कालच्या विजयी मेळाव्यानंतर प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन पानाचं पत्र लिहिलं आहे. यामध्ये ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.  महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत,  कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला, असं या पत्रात म्हटलं आहे.   

प्रताप सरनाईक यांनी तीन पानी पत्र लिहिलं आहे, यामध्ये कशापद्धतीनं मराठी माणसाला टोपी घालण्यात आली, आणि हे सगळं ठाकरे बंधू कशापद्धतीनं पाहात होते? या सर्वांचा उल्लेख आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यचा डाव आहे, असा अपप्रचार काहीजण वर्षांनुवर्ष करत आहोत, आणि मराठी माणसांची मत लाटली जात आहेत. मुंबईचा नाही पण प्रत्यक्षात स्वत:चाच विकास शिवसेना ठाकरे गटानं केला आहे, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.  मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकणार नाही, ती हिंमत कोणातच नाही, हेही यांना चांगलंच माहीत आहे, परंतु तरी देखील हे सांगितलं जात आहे, असंही या पत्रात सरनाईक यांनी म्हटलं आहे. 

शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात वीस वर्षांनंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. मात्र त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.