AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता अनेकजण दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही’, अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी

"आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भूमिका नसते. लवकर काम सुरू केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो," असं मत अजित पवार यांनी बारामतीत व्यक्त केलं.

'आता अनेकजण दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही', अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी
अजित पवार, उपमुख्यमंत्री
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 21, 2021 | 8:59 AM
Share

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झालीय. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेच्या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन करण्यात आले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलाची अजित पवार यांनी माहिती घेतली. तसेच काम दर्जेदार करण्याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना केल्या. यावेळी सहारा फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशिन वाटपही करण्यात आलंय. मुस्लिम बँकेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार हेही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं संकट आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. या काळातही विकास कामं सुरू आहेत. बारामतीत अनेक कामे सुरू आहेत. बारामतीकरांचं प्रेम, पाठिंबा आणि शरद पवार यांचे आशिर्वाद यामुळे हे सगळं होतंय. सच्चर कमिटीच्या अहवालामध्ये अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. मात्र, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीनं घ्याव्या लागतात.”

“मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भूमिका नसते”

“आम्हाला बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीय. शरद पवार यांच्यामुळे ही सवय लागलीय. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही. मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भूमिका नसते. लवकर काम सुरू केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो. बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय होणार आहे. बारामतीकरांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“उत्पन्न साडेचारवरुन सव्वातीन लाख कोटींवर, पगार द्यावेच लागतात”

“महिलांना आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला. कोरोना काळात रोजगार अडचणीत आले आहेत. राज्य सरकारचं उत्पन्न साडेचारवरुन सव्वातीन लाख कोटींवर आलंय. पगार द्यावेच लागतात. कोरोना काळ आहे. काळजी घ्या. नियमांचं पालन करा,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

पुण्यात 70 लाख कोरोना लसीकरणाचा टप्पा पार; अजित पवारांकडून कोव्हिड-19 च्या परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

राज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकत्र, राज्याचे नवे लोकायुक्त नेमके कोण?

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar instruct government officer and contractor about work quality

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.