AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं?; अजित पवार यांनी उडवली खिल्ली

राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. ते बारामतीत होते. अजित पवार यांनी यावेळी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली.

राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं?; अजित पवार यांनी उडवली खिल्ली
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 07, 2023 | 2:20 PM
Share

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी अजितदादांच्या केलेल्या मिमिक्रीची चर्चा होत असतानाच अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय दुसरं येतंच काय? असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीची खिल्ली उडवली. पुण्यात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली. आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते, काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

काही अडचण?

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्याची घोषणा करण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला अजित पवार नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले.

ये… त्याच्याबद्दल पवार साहेबांनीच सांगितलं. पुन्हा पुन्हा काय रे ते… तिथं भुजबळ साहेब होते का?… होते? काय बोलतोय… अरे वेड्या 25 जणं आम्ही त्या कमिटीत होतो. पवार साहेबांना आम्ही भेटायला गेल्यानंतर पवार साहेब म्हणाले, त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेला हजर राहावं. प्रांत अध्यक्ष म्हणून जयंतरावांनी उपस्थित राहावं. केरळचे प्रतिनिधी म्हणून आमदार आले होते. त्यांनी उपस्थित राहावं. नॉर्थमधील नेते होते. पीसी चाको निघून गेले. अशा ठरावीक लोकांनी उपस्थित राहण्याचं ठरलं. पत्रकार परिषदेत चारपाच खुर्च्या असतात. त्यामुळे साहेब म्हणाले, बाकी येऊ नका. साहेबांचा आदेश शिरसावंद्य. काही अडचण?, असा सवाल अजितदादांनी केला.

मला काय करायचं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात प्रचारासाठी गेले आहेत. त्याबाबत अजितदादांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री कुठे गेले मला काय करायचं? मुख्यमंत्री कुठे गेले मी त्यांच्या वॉचवर नाही. तुम्ही माझ्या वॉचवर आहात तसं मी नाही. मला माझी कामे आहेत. मी ते करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.