AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील ‘रानडे इन्स्टिट्यूट’च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव, नेमकं कारण काय?

पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध होतोय.

पुण्यातील 'रानडे इन्स्टिट्यूट'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव, नेमकं कारण काय?
रानडे इन्स्टिट्यूट, पुणे
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 5:24 PM
Share

पुणे : पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध होतोय. विद्यापीठाने रानडेतील पत्रकारितेचा विभाग आणि विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडी यांचं विलिनीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवलाय. मात्र, यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या ओळखीला धक्का लागेल, असं मत व्यक्त होत आहे.

पुणे विद्यापीठ दोन्ही विभागांचं विलिनीकरण करुन नवा विभाग तयार करण्यावर विचार करत आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास रानडे इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रम कम्युनिकेशन स्टडीसोबत विद्यापीठात चालवला जाईल. मात्र, याला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. पत्रकारितेचा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात नेल्यास रानडेची वेगळी ओळख पुसली जाईल, असा आरोप होत आहे.

“रानडेची स्वतंत्र ओळख पुसण्याचा कुलगुरूंचा डाव तर नाही ना?”

अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप अंबेकर म्हणाले, “विलिनीकरणाचा प्रस्ताव अत्यंत वेदनादायी व चीड आणणारा आहे. या रानडेचे विविध विद्यार्थी देशाभरातील अनेक माध्यम संस्थांमध्ये काम करतात. रानडेची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ती ओळख पुसण्याचा डाव तर कुलगुरुंचा नाही ना? नेमका हा विभाग विद्यापीठात घेऊन का जात आहेत? याबाबत कुलगुरूंनी कारण स्पष्ट करावे. याबाबतचं परीपत्रक विद्यापीच्या वेबसाईटवर अद्यापही नाही. एवढी गुप्तता का? कशासाठी? कुणीही मागणी केलेली नसताना हा बदल करण्याचा अटट्हास का? कोणाच्या सांगण्यावरुन हे राजकीय षडयंञ घडतेय?”

“रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये”

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रिका विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठ आवारातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलिन करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. याला युक्रांदचा विरोध आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात घालू नये. विद्यापीठ वारंवार वादाचे निर्णय जाणीवपूर्वक घेत असल्याचेच यावर दिसत आहे,” असं मत युक्रांदचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी व्यक्त केलं.

“दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नाही”

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वाद झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. दोन्ही विभागाच्या विलिनीकरणाचा निर्णय अंतिम नसल्याचं त्यांनी सांगितलं. रानडेमधील वृत्तपत्रविद्या विभागाला विद्यापीठात जागा दिली जाईल. तेथे त्यांना हवे ते अभ्यासक्रम चालवता येतील. रानडेत डागडुजी आणि नुतनीकरण करणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेत आहोत.”

हेही वाचा :

पुण्यात उद्यापासून मॉल सुरू होणार पण तुम्हाला प्रवेश मिळणार का? वाचा काय आहे नियम?

Pune Corona Update : ‘शिथिलता दिली आहे, पण….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?

व्हिडीओ पाहा :

Controversy over decision of Merger of Ranade Institute in SPPU Media and Communication department

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.