AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर त्याची दोन शक्कलं झाली. बारामतीत आता पवार विरोधात पवार असा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतच सामना दिसत असला तरी शरद पवार विरुद्ध भाजप असा हा सामना आहे का, यासह अनेक प्रश्नांवर शरद पवार यांनी मत व्यक्त केले.

Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण
पक्ष फुटीमागे काय आहे कारण
| Updated on: Apr 25, 2024 | 6:58 PM
Share

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत पण उभ्या देशानं फूट पाहिली. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पक्षांची दोन शक्कलं झाली. लोकसभा निवडणुकीत बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. 1967 पासून हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच आता पवार विरुद्ध पवार अशी चुरस आहे. राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का, अजितदादा यांनी यापूर्वी पण राष्ट्रवादीच्या विचारसरणीपेक्षा वेगळी भूमिका घेतलेली असताना त्यांना पुन्हा पक्षात का घेण्यात आले. यासह इतर अनेक प्रश्नांना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उत्तरं दिली.

वर्चस्वातून फुटला पक्ष?

राष्ट्रवादी पक्ष कशामुळे फुटला याची चर्चा नेहमी होते. राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्यासाठी ही फूट पडली का, या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले. वर्चस्वातून पक्ष फुटला नाही तर एजन्सींचे चौकशींचे जे उद्योग सुरु होते. त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काही नेत्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली होती. त्याचा किस्सा त्यांनी सांगितला. एका सहकाऱ्याच्या कुटुंबांची काय अवस्था झाली याचं उदाहरण देत, पक्ष फुटीची कारणं त्यांनी समोर आणली.

जुन्या सहकाऱ्यांना संधी देणार का?

2019 मध्ये अजित पवारांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर ते परत आले. त्यांनी चूक कबूल केली आणि त्यांना संधी देण्यात आल्याचे पवारांनी स्पष्ट केले. अशीच भूमिका राष्ट्रवादीतील जुन्या सहकाऱ्यांबाबत घेणार का असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते येतील तेव्हा पाहू असे सांगत, जोपर्यंत मोदी सत्तेत आहे, तोपर्यंत हे सहकारी परत येण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

संविधानावर हल्ला होऊ शकतो

जर 400 च्यावर भाजपच्या जागा आल्या तर संविधान बदलणार असा आरोप शरद पवार यांनी अनेक सभेतून केला आहे. त्याविषयी विचारणा केली असता, पवारांनी विविध राज्यातील चार खासदारांची वक्तव्य काय आहेत याचं उदाहरण दिले. त्यांच्या वक्तव्यावरुन देशातील संविधान संकटात जाण्याची शकत्या नाकारता येत नाही, असे पवारांनी सांगितले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.