Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर त्याची दोन शक्कलं झाली. बारामतीत आता पवार विरोधात पवार असा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतच सामना दिसत असला तरी शरद पवार विरुद्ध भाजप असा हा सामना आहे का, यासह अनेक प्रश्नांवर शरद पवार यांनी मत व्यक्त केले.

Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण
पक्ष फुटीमागे काय आहे कारण
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 6:58 PM

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत पण उभ्या देशानं फूट पाहिली. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पक्षांची दोन शक्कलं झाली. लोकसभा निवडणुकीत बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. 1967 पासून हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच आता पवार विरुद्ध पवार अशी चुरस आहे. राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का, अजितदादा यांनी यापूर्वी पण राष्ट्रवादीच्या विचारसरणीपेक्षा वेगळी भूमिका घेतलेली असताना त्यांना पुन्हा पक्षात का घेण्यात आले. यासह इतर अनेक प्रश्नांना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उत्तरं दिली.

वर्चस्वातून फुटला पक्ष?

राष्ट्रवादी पक्ष कशामुळे फुटला याची चर्चा नेहमी होते. राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्यासाठी ही फूट पडली का, या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले. वर्चस्वातून पक्ष फुटला नाही तर एजन्सींचे चौकशींचे जे उद्योग सुरु होते. त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काही नेत्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली होती. त्याचा किस्सा त्यांनी सांगितला. एका सहकाऱ्याच्या कुटुंबांची काय अवस्था झाली याचं उदाहरण देत, पक्ष फुटीची कारणं त्यांनी समोर आणली.

हे सुद्धा वाचा

जुन्या सहकाऱ्यांना संधी देणार का?

2019 मध्ये अजित पवारांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर ते परत आले. त्यांनी चूक कबूल केली आणि त्यांना संधी देण्यात आल्याचे पवारांनी स्पष्ट केले. अशीच भूमिका राष्ट्रवादीतील जुन्या सहकाऱ्यांबाबत घेणार का असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते येतील तेव्हा पाहू असे सांगत, जोपर्यंत मोदी सत्तेत आहे, तोपर्यंत हे सहकारी परत येण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

संविधानावर हल्ला होऊ शकतो

जर 400 च्यावर भाजपच्या जागा आल्या तर संविधान बदलणार असा आरोप शरद पवार यांनी अनेक सभेतून केला आहे. त्याविषयी विचारणा केली असता, पवारांनी विविध राज्यातील चार खासदारांची वक्तव्य काय आहेत याचं उदाहरण दिले. त्यांच्या वक्तव्यावरुन देशातील संविधान संकटात जाण्याची शकत्या नाकारता येत नाही, असे पवारांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.